शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

प्रेम देवाचे देणे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 3:57 AM

प्रेम जसजसे व्यापक होत जाते, तसतसे झाडा-माडावर, गुरां-पाखरांवर, मुला-बाळांवर अन् समाजातील प्रत्येक घटकाला ‘लळा’ लावण्याचा अंतरंगी जिव्हाळा निर्माण होतो.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेप्रेम! केवळ अडीच अक्षरी शब्द. ज्याच्या प्राप्तीसाठी सीता वनवासी झाली. तर वृंदेच्या प्रेमासाठी हरी वृंदावनवासी झाला. प्रेमानेच माणसाला जगण्याचा प्रकाश दिला. प्रेमानेच नातेसंबंधाची वीण एवढी घट्ट विणली गेली आहे की, जोपर्यंत सजीव सृष्टीचे अस्तित्व राहणार आहे, तोपर्यंत आई-मूल, बहीण-भाऊ, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, भक्त-भगवंत यांच्या प्रेमाची जलधारा जगाला हिरवेगार करणार आहे. ज्या दिवशी ‘प्रेम’ नष्ट होर्ईल, त्याच दिवशी माणसाचे यंत्र होईल आणि विश्वाचे वैराण वाळवंट होईल. प्रेमाचा विकास जेव्हा ‘तो’ आणि ‘ती’च्या पलीकडे जातो तेव्हा माणसाच्या अंत:करणाचा खरा विकास होतो. प्रेम जसजसे व्यापक होत जाते, तसतसे झाडा-माडावर, गुरां-पाखरांवर, मुला-बाळांवर अन् समाजातील प्रत्येक घटकाला ‘लळा’ लावण्याचा अंतरंगी जिव्हाळा निर्माण होतो, यालाच तर तुकोबांनी देवत्वाची उपमा देताना म्हटले आहे -प्रेम देवाचे देणे । देह भाव जाय देणे ।न धरावी मने । शुद्धी देश-काळाची ।मुक्त लज्जा विरहित । भाग्यवंत हरिभक्त ।झाले ओसंडत । नामकीर्ती पोवाडे ।जोडी जाहली अविनाश । जन्मोनी झाले हरिचे दास।हेचि वाहती संकल्प । पुण्य प्रसंगाचे जप ।तुका म्हणे पाप । गावी नाही हरिजना ॥जेव्हा मनाची परडी प्रभुप्रेमाची फुले वेचण्यासाठी आतुर होते, तेव्हा देहभाव नष्ट होऊन भक्तच प्रेमाचे मूर्तिमंत रूप होतो. आत्मिक प्रेमाच्या सर्वोच्च अवस्थेत जेव्हा प्रेमयोगी पोहोचतो तेव्हा देश, काळ, स्थळाची भौतिक बंधने आपोआपच गळून पडतात आणि तो कधी त्याची मुरली, वैजयंती, पितांबर, मोरमुकुट होऊन जातो अन् प्रभुप्रेमाची माधुरी अनुभवतो. धरतीतून अंकुरणारा अंकुर धरतीच्या प्रेमाची ऊब अनुभवतच आकाशगामी होतो. पक्षिणीच्या घरट्यातील छोटेसे पिल्लू आईच्या पंखाखाली साऱ्या दुनियेतला नि:शब्द आनंद अनुभवते, तर मातेच्या कुशीत विसावणारे बालक वात्सल्याच्या भावगंगेत न्हाऊन जाते. तसेच माणसाचे प्रेमसुद्धा विकास पावलेल्या मनाचा सुगंध आहे. हेच प्रेम जेव्हा प्रभुप्रेमाच्या दिव्य साम्राज्यात पोहोचते तेव्हा नाना साधनांच्या खटपटांचा उद्योग आपोआपच थांबतो. प्रभुप्रेमाच्या वात्सल्याने देहभान हरपलेल्या सुरदासांना केवळ यशोदा आणि श्रीकृष्णाच्या वात्सल्यात प्रेमाचा साक्षात्कार झाला नाही, तर घराघरांतील अंगणात रांगणाºया बालकांमध्ये कृष्णप्रेमाचा साक्षात्कार झाला. नरसी मेहताच्या हुंडीतून तो आपल्या प्रेमाची बासरी वाजवू लागला. प्रभुप्रेमाचे पैंजण पायात बांधून ज्याच्या प्रेमाची आयुष्यभर एकांत आराधना करणारी प्रेमदिवानी मीराबाई तर म्हणू लागली -हारी मा दरद दिवानी, मेरा दरद ना जानै कोई ।घायाल की गत घायाल जानै, हिवडो अंगण संजोई ।हृदयाचे अंगण ज्याच्यासाठी झाडून पुसून स्वच्छ केले तो गिरीधर गोपाल जर हृदयाच्या अंगणात खेळायलाच आला नाही, तर भक्ताच्या हृदयाला होणारी जखम इतरांना कशी कळणार? कारण प्रेम वियोगाने जखमी होणाºयालाच जखमी होण्याच्या वेदना कळतात. हातात बाण घेऊन त्याची शिकार करणाºया शिकाºयाला या वेदना कधी कळत नाहीत. ईश्वरी प्रेमनिष्ठेबरोबच मानवजातीमध्ये प्रेमाचे संवर्धन व्हावे, यासाठी साºयाच संतांनी आपल्या अलौकिक प्रेमभावनेचे लौकिक स्तरावर येऊन वर्णन केले व प्रेमाच्या अनन्यतेविषयी इशारा देताना सांगितले -प्रेम न बाडी उपजे, प्रेम न घाट बिकावें ।राजा-परजा जेहीं रुचे, सीस देई लई जाएँ ।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक