शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

मित्रांनो, वेळीच व्यक्त व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 11:26 IST

कारण.. आसक्ती दुःखाचे कारण आहे.

- डॉ. दत्ता कोहिनकर

मित्रांनो, वॉशिंग मशिनमधून धुऊन झालेले कपडे बाहेरच न काढता मशीनमध्येच ठेवले तर त्याला घाण वास येऊन ती दुर्गधी तुम्हाला असह्य करेल . आपल्याला कोणीतरी प्रचंड दुखावल ; बैचेनी, अस्वस्थता, व्याकुळता, द्वेष, क्रोध, अपराधीपणाची भावना , प्रेम, अशा अनेक भावनिक विचारांनी मनात अस्वस्थता आली , घालमेल सुरू झाली . त्या विचारांचे मजल्यावर मजले तुम्ही मनातच व्यक्त करीत राहिला , ते विचार तुम्ही व्यक्त केले नाही , बाहेर काढले नाही . भावनांचे कल्लोळ मनातच दाबून ठेवले तर त्या दमन केलेल्या भावना आपल्याला बेचैनी व नैराश्याकडे नेतील व हे दमन आज ना उद्या अक्राळविक्राळ रूप धारण करून नको त्या गोष्टी घडतील . म्हणून मनात दबलेल्या भावना , विचार योग्य व्यक्तींसमोर व्यक्त करा . योग्य पार्टनर शोधा जो तुम्हाला मोकळं होण्यास मदत करेल व तुमच्या विषयी निकष न लावता सर्व गुप्त ठेवेल. त्यालाही तुम्ही मोकळं होण्यास मदत करा .एकमेकांच लक्ष देऊन पूर्ण ऐकून घेतलं तरी माणस मनानी हलकी होतात . हे करत असताना वेळ पडल्यास त्या व्यक्तीला मिठी मारा ( *जादू की झप्पी ) , हात हातात घेऊन पूर्ण समरस होऊन तिला ऐका. ती  रडावयास लागली तर पूर्णतः रडू द्या . दोघांनीही एकमेकांना ठराविक वेळ देऊन असे सेशन घ्या . फक्त 'भावनिक एकमेकांत अडकू नका . कारण आसक्ती  , दुःखाचे कारण आहे*. परदेशात यासाठी काही संस्थांनी स्वमदत गट केले आहेत . यात स्त्री पुरुष दोघेही सामील होतात. आज या गोष्टीची नितांत गरज आहे. माझ्या मित्राच्या आईला मी वेळ देऊन तिला पूर्ण बोलते केले ,हातात हात घेऊन तिचे ऐकून घेतले . मिठी मारल्यावर ती ओक्साबोक्सी रडली.ती आज मोकळी झालीय . कुकरची शिट्टी दाबू नका . आतील वाफ रुद्र रूप धारण करून स्फोट होऊ शकतो . म्हणतात ना , मुझे कुछ कहना है , मुझे भी कुछ कहना है । मित्रांनो वेळीच व्यक्त व्हा , अर्थात ढक्कन खोलून टाका. यामुळे मनाची सबलता व निर्मलता वाढते . 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना