शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

स्पंदन; स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 3:49 AM

कोणतेही कार्य करा पण मनापासून करा. मग ती प्रार्थना असो, जेवण असो किंवा अभ्यास असो. त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते.

-ब्रह्मकुमारीविश्वासाच्या आधारावर वाईट वृत्ती किंवा सवयी असलेल्या मनुष्यांमध्येसुद्धा खूप मोठा बदल आपण घडवून आणू शकतो. विश्वासाच्या पाठीमागे आपली शुभभावना, श्रेष्ठ वृत्तीची साथ जर एखाद्या व्यक्तीला मिळत असेल तर हा खूप मोठा सहयोग आपण त्याला देत आहोत. कितीतरी वेळा आपण बघतो माणूस विविध मुखवटे घालून कार्य करतो ज्यामुळे त्यांची खरी ओळख, खरा स्वभाव समजण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी द्यायला लागतो. अशावेळी स्वत:चीच खरी ओळख काय हे त्यालाच समजत नाही. मी असा का? हे थोडं थांबून स्वत:ला विचारण्याची नितांत गरज आहे. जी आपली भावना आहे तीच भावना त्या व्यक्तीच्या मनात पेरली जाते. मग ती प्रेमाची असो वा द्वेषाची. जर नकारात्मक भावना पोहोचू शकतात तर शुभभावनांचा ही परिणाम होऊ शकतो. शुभ भावनांनी तुटलेली नाती परत जोडू शकतो. वस्तू, पदार्थ, धन यांच्यापेक्षा मला हे नातं महत्त्वाचं आहे हे स्वत:ला पटवून देण्याची आवश्यकता आहे. आज जीवनात कोणताही बदलाव आणायचा असेल तर मनुष्य पहिला प्रश्न विचारतो, ‘मीच का?’ परिवर्तनाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. पण स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन होते हे आपण लक्षात ठेवावे. बुद्धिजीवी मनुष्य जेव्हा एखादे कार्य बुद्धीच्या स्तरावर करतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या बुद्धीवर होतो. पण तीच गोष्ट जर हृदयाच्या स्तरावर केली तर दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श होतो. म्हणून सांगितले जाते, कोणतेही कार्य करा पण मनापासून करा. मग ती प्रार्थना असो, जेवण असो किंवा अभ्यास असो. त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक