शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

अनुभव जीवनाला निश्चित दिशा दाखवितो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 07:26 IST

अनुभवानुसार माणूस वागतो. तसाच तो संसारात व्यवहार करतो. अनुभवामुळे तो चाणाक्ष होतो. त्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर अनुभवाने तो साध्य करतो.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

माणसाला अनुभवातून खूप काही शिकता येते. अनुभव हाच माणसाची खरी ओळख करून देत असतो. मनाला अनुभवाच्या वाटेने जाऊ द्या. अनुभवातून माणूस शहाणा होतो. बाह्य प्रपंचाची ओळख होते. माणूस वेगवेगळ्या गोष्टींचे चिंतन सोडून देतो. अनुभवाप्रमाणे मन वळवतो. मनाला सुखाची चटक लावतो किंवा दु:खाची चाहूल कळवतो. संसारात किंवा परमार्थात अनुभव निश्चय पक्का करतो. अनुभव जीवनाला एक निश्चित दिशा दाखवितो. अनुभवी माणूस आपले मन आपल्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. इंद्रियांनी नेमलेल्या स्थितीत न राहाता आपल्या अनुभवानुसार इंद्रियांना वळवितो. मनाला चालना देतो. बुद्धीला स्थिर करून संकल्पाची येरझारा थांबवितो. अनुभव प्रगट करता येतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे’.

अनुभवानुसार माणूस वागतो. तसाच तो संसारात व्यवहार करतो. अनुभवामुळे तो चाणाक्ष होतो. त्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर अनुभवाने तो साध्य करतो. अनुभवामुळे मनाला पाप-पुण्यादी कर्म कळते. योगमार्गाचा अनुभव कसा आहे, हे योगीच सांगू शकतील. तसेच संपत्तीवान माणूस संपत्तीचा अनुभव सांगू शकेल. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आपला अनुभव सांगते. त्यामुळे अन्य व्यक्ती तसा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. व्यर्थ बोलण्याचा अनुभव, कमी बोलण्याचा अनुभव, शूरवीरांचा अनुभव, साधू-संतांचा अनुभव, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनुभव, संरक्षण, अर्थक्षेत्रातील अनुभव, प्राण्यांचा, वनस्पतींचा अनुभव असे निरनिराळे अनुभव असतात. अनुभवी माणूस ज्ञानचक्षूंनी सर्वांकडे पाहतो. तो कुठलीही गोेष्ट दृष्टीआड करीत नाही. आपापल्या विषयानुसार तो कळकळीने खरे सांगतो. मनाच्या स्वभावाचा तो पत्ता सांगतो. सारासार बुद्धीला अनुभव भ्रमात पाडत नाही. अनुभवी माणूस आपल्या ठिकाणी अचल असतो. त्याचे व्यापकपण तो आपल्या अनुभवाने कवटाळतो. तो सम-विषम भाव जाणत असतो. मनाला स्थिर कसे करायचे याचा अनुभव तो सांगत असतो. मनाचा स्वभाव चपळ आहे; पण मौन धरून किंवा ईश्वराचा जप करून चंचल मन स्थिर होऊ शकते. हा संतांचा अनुभव आहे. योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना होऊ शकत नाही. कारण मन अनावर आहे, चपळ आहे. परंतु मनाला आवर घातला की, इंद्रियांवर ताबा मिळविता येतो. इंद्रियांना जिंकले की, आत्मसुखाचा प्रसाद मिळतो. हाच अनुभव अनेक योगी सांगतात. अनुभव हीच सुखाची खरी गुरूकिल्ली आहे.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक