शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अनुभव जीवनाला निश्चित दिशा दाखवितो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 07:26 IST

अनुभवानुसार माणूस वागतो. तसाच तो संसारात व्यवहार करतो. अनुभवामुळे तो चाणाक्ष होतो. त्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर अनुभवाने तो साध्य करतो.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

माणसाला अनुभवातून खूप काही शिकता येते. अनुभव हाच माणसाची खरी ओळख करून देत असतो. मनाला अनुभवाच्या वाटेने जाऊ द्या. अनुभवातून माणूस शहाणा होतो. बाह्य प्रपंचाची ओळख होते. माणूस वेगवेगळ्या गोष्टींचे चिंतन सोडून देतो. अनुभवाप्रमाणे मन वळवतो. मनाला सुखाची चटक लावतो किंवा दु:खाची चाहूल कळवतो. संसारात किंवा परमार्थात अनुभव निश्चय पक्का करतो. अनुभव जीवनाला एक निश्चित दिशा दाखवितो. अनुभवी माणूस आपले मन आपल्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. इंद्रियांनी नेमलेल्या स्थितीत न राहाता आपल्या अनुभवानुसार इंद्रियांना वळवितो. मनाला चालना देतो. बुद्धीला स्थिर करून संकल्पाची येरझारा थांबवितो. अनुभव प्रगट करता येतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे’.

अनुभवानुसार माणूस वागतो. तसाच तो संसारात व्यवहार करतो. अनुभवामुळे तो चाणाक्ष होतो. त्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर अनुभवाने तो साध्य करतो. अनुभवामुळे मनाला पाप-पुण्यादी कर्म कळते. योगमार्गाचा अनुभव कसा आहे, हे योगीच सांगू शकतील. तसेच संपत्तीवान माणूस संपत्तीचा अनुभव सांगू शकेल. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आपला अनुभव सांगते. त्यामुळे अन्य व्यक्ती तसा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. व्यर्थ बोलण्याचा अनुभव, कमी बोलण्याचा अनुभव, शूरवीरांचा अनुभव, साधू-संतांचा अनुभव, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनुभव, संरक्षण, अर्थक्षेत्रातील अनुभव, प्राण्यांचा, वनस्पतींचा अनुभव असे निरनिराळे अनुभव असतात. अनुभवी माणूस ज्ञानचक्षूंनी सर्वांकडे पाहतो. तो कुठलीही गोेष्ट दृष्टीआड करीत नाही. आपापल्या विषयानुसार तो कळकळीने खरे सांगतो. मनाच्या स्वभावाचा तो पत्ता सांगतो. सारासार बुद्धीला अनुभव भ्रमात पाडत नाही. अनुभवी माणूस आपल्या ठिकाणी अचल असतो. त्याचे व्यापकपण तो आपल्या अनुभवाने कवटाळतो. तो सम-विषम भाव जाणत असतो. मनाला स्थिर कसे करायचे याचा अनुभव तो सांगत असतो. मनाचा स्वभाव चपळ आहे; पण मौन धरून किंवा ईश्वराचा जप करून चंचल मन स्थिर होऊ शकते. हा संतांचा अनुभव आहे. योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना होऊ शकत नाही. कारण मन अनावर आहे, चपळ आहे. परंतु मनाला आवर घातला की, इंद्रियांवर ताबा मिळविता येतो. इंद्रियांना जिंकले की, आत्मसुखाचा प्रसाद मिळतो. हाच अनुभव अनेक योगी सांगतात. अनुभव हीच सुखाची खरी गुरूकिल्ली आहे.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक