शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

जागृत तीर्थक्षेत्रांवर प्रमलतेची अनुभती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 07:20 IST

मनाची मलिनता दूर करणारे तीर्थक्षेत्र म्हणून त्याचा महिमा गायीला जातो. तीर्थक्षेत्र मानवाच्या आंतरप्रक्रियेत बदल घडवतात.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमनाची मलिनता दूर करणारे तीर्थक्षेत्र म्हणून त्याचा महिमा गायीला जातो. तीर्थक्षेत्र मानवाच्या आंतरप्रक्रियेत बदल घडवतात. तीर्थक्षेत्रावर स्नानकुंड, घंटा, शंख, मूर्ती इत्यादींचा जवळून परिचय होतो. स्नानकुंडावर स्नान केल्याने बाह्य मल नाहीसा होतो. घंटा व शंखध्वनीमुळे आत्मिक ऊर्जा मिळते. त्या घंटेच्या व शंखाच्या लहरींची कुंपणं तयार होतात. त्यातून मानसिकतेत बदल घडतात. आत्मस्फूर्ती निर्माण होते. मानसिक रोग बरे होतात. ती ऊर्जास्पंदने शरीराला घातक असणाऱ्या जीवजंतूंपासून संरक्षण करतात. त्या पहाटेच्या लहरींनी मज्जारज्जू ताजेतवाने होतात. आत्मस्थितीत बदल घडवतात. मनोबल उंचावण्यात मदत करतात.निरोगी आयुष्यासाठी शंखध्वनीची ऊर्जा अतिशय महत्त्वाची आहे. पूर्वीचे साधू किंवा पंडित उघड्या अंगाने मूर्तीसमोर पवित्र अंत:करणाने ध्यान लावत. त्या ऊर्जावलय वातावरणात त्यांचे मन प्रसन्न होऊन जात असे. म्हणून प्राचिन व जागृत अवस्थेतील तीर्थक्षेत्रावर आजही प्रसन्नतेची अनुभूती मिळते. पूर्वीच्या तीर्थक्षेत्राची शास्त्रीय पद्धतीने रचना केली गेलेली आहे. म्हणून भारतीय संस्कृतीत तीर्थक्षेत्रांचा मोठा गवगवा केला आहे. मनाची ऊर्जा केंद्रे म्हणून तीर्थक्षेत्राकडे पाहिले जात होते. कारण आपल्या वैदिक धर्मातही मूर्तिपूजा ही अनादिकालापासून आहे. वेदामध्ये उद्रगीय, दहर, शांडिल्य, मधू इत्यादी उपासना सांगितल्या आहेत. पुराणकाळापासून रामकृष्णादी मूर्तीची उपासना सुरू झाली.प्राथमिक भक्तिस्वरूप प्रकट करायचे असेल तर मनात कुठलीतरी प्रतिमा समोर ठेवूनच भक्ती केली जाते. ज्याला प्राकृतभक्ती म्हणता. वारकरी संप्रदायामध्येसुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या उपासनेची पद्धत आहे. पंढरपूरचा तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख आहे. स्वत: शंकराचार्य महाराजांनी पांडुरंगाच्या मूर्तीबद्दल ‘परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम्’’ ज्ञानदेवांच्या भाषेत ‘नेणो ब्रह्म मार्ग चुकले । उघडे पंढरपुरा आले’’ अशा परब्रह्ममूर्ती वारकरी संप्रदायात उपास्य दैवत म्हणून ओळखले जाते. सर्वच ब्रह्मरूप मानणा-यांना मूर्तीतही ईशस्वरूप दिसते. फक्त आपल्या मनाचा भाव पक्का असावा लागतो. मनच परब्रह्मस्वरूप बनवले पाहिजे. म्हणजे ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ याची जाणीव होते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाव धरा असे संतांनी सांगितले. ते तीर्थक्षेत्र किती महत्त्वाची भूमिका निभावते ते वरीलप्रमाणे सांगितले आहे.तीर्थव्रती भाव धरी रे करुणा ।शांती दया पाहुणा हरी करी।।- संत ज्ञानेश्वर(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक