शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जागृत तीर्थक्षेत्रांवर प्रमलतेची अनुभती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 07:20 IST

मनाची मलिनता दूर करणारे तीर्थक्षेत्र म्हणून त्याचा महिमा गायीला जातो. तीर्थक्षेत्र मानवाच्या आंतरप्रक्रियेत बदल घडवतात.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमनाची मलिनता दूर करणारे तीर्थक्षेत्र म्हणून त्याचा महिमा गायीला जातो. तीर्थक्षेत्र मानवाच्या आंतरप्रक्रियेत बदल घडवतात. तीर्थक्षेत्रावर स्नानकुंड, घंटा, शंख, मूर्ती इत्यादींचा जवळून परिचय होतो. स्नानकुंडावर स्नान केल्याने बाह्य मल नाहीसा होतो. घंटा व शंखध्वनीमुळे आत्मिक ऊर्जा मिळते. त्या घंटेच्या व शंखाच्या लहरींची कुंपणं तयार होतात. त्यातून मानसिकतेत बदल घडतात. आत्मस्फूर्ती निर्माण होते. मानसिक रोग बरे होतात. ती ऊर्जास्पंदने शरीराला घातक असणाऱ्या जीवजंतूंपासून संरक्षण करतात. त्या पहाटेच्या लहरींनी मज्जारज्जू ताजेतवाने होतात. आत्मस्थितीत बदल घडवतात. मनोबल उंचावण्यात मदत करतात.निरोगी आयुष्यासाठी शंखध्वनीची ऊर्जा अतिशय महत्त्वाची आहे. पूर्वीचे साधू किंवा पंडित उघड्या अंगाने मूर्तीसमोर पवित्र अंत:करणाने ध्यान लावत. त्या ऊर्जावलय वातावरणात त्यांचे मन प्रसन्न होऊन जात असे. म्हणून प्राचिन व जागृत अवस्थेतील तीर्थक्षेत्रावर आजही प्रसन्नतेची अनुभूती मिळते. पूर्वीच्या तीर्थक्षेत्राची शास्त्रीय पद्धतीने रचना केली गेलेली आहे. म्हणून भारतीय संस्कृतीत तीर्थक्षेत्रांचा मोठा गवगवा केला आहे. मनाची ऊर्जा केंद्रे म्हणून तीर्थक्षेत्राकडे पाहिले जात होते. कारण आपल्या वैदिक धर्मातही मूर्तिपूजा ही अनादिकालापासून आहे. वेदामध्ये उद्रगीय, दहर, शांडिल्य, मधू इत्यादी उपासना सांगितल्या आहेत. पुराणकाळापासून रामकृष्णादी मूर्तीची उपासना सुरू झाली.प्राथमिक भक्तिस्वरूप प्रकट करायचे असेल तर मनात कुठलीतरी प्रतिमा समोर ठेवूनच भक्ती केली जाते. ज्याला प्राकृतभक्ती म्हणता. वारकरी संप्रदायामध्येसुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या उपासनेची पद्धत आहे. पंढरपूरचा तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख आहे. स्वत: शंकराचार्य महाराजांनी पांडुरंगाच्या मूर्तीबद्दल ‘परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम्’’ ज्ञानदेवांच्या भाषेत ‘नेणो ब्रह्म मार्ग चुकले । उघडे पंढरपुरा आले’’ अशा परब्रह्ममूर्ती वारकरी संप्रदायात उपास्य दैवत म्हणून ओळखले जाते. सर्वच ब्रह्मरूप मानणा-यांना मूर्तीतही ईशस्वरूप दिसते. फक्त आपल्या मनाचा भाव पक्का असावा लागतो. मनच परब्रह्मस्वरूप बनवले पाहिजे. म्हणजे ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ याची जाणीव होते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाव धरा असे संतांनी सांगितले. ते तीर्थक्षेत्र किती महत्त्वाची भूमिका निभावते ते वरीलप्रमाणे सांगितले आहे.तीर्थव्रती भाव धरी रे करुणा ।शांती दया पाहुणा हरी करी।।- संत ज्ञानेश्वर(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक