शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 8:30 PM

समजा एखादे लहान मूल हिंदुच्या घरात जन्माला आले व ते पळवले गेले आणि ख्रिश्चन माणसाच्या घरात जाऊन पडले तर ते भविष्यात स्वत:ला ख्रिश्चन म्हणवणार. पण जर ते हिंदूच्या घरीच वाढले असते तर ते स्वत:ला हिंदू म्हणवणार. म्हणजे या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत.

- सदगुरू श्री वामनराव पै

कल्पनेने धुमशान घातलेले आहे

समजा एखादे लहान मूल हिंदुच्या घरात जन्माला आले व ते पळवले गेले आणि ख्रिश्चन माणसाच्या घरात जाऊन पडले तर ते भविष्यात स्वत:ला ख्रिश्चन म्हणवणार.पण जर ते हिंदूच्या घरीच वाढले असते तर ते स्वत:ला हिंदू म्हणवणार.म्हणजे या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत.लहान मुलाला लहानपणी जात,धर्म, वर्ण हे काहीच नसते पण आपण समाज त्याला ते सर्व चिकटवितो व हे लहानपणीच चिकटविल्यामुळे ते त्याच्या अंतर्मनात जाते.लहानपणी मुलांचे बहिर्मन हे अगदीच शून्य असते व अंतर्मन कार्यरत असते. त्यामुळे आपण लहानपणी जे काही मुलांना शिकवितो ते ती चटकन शिकतात.लहान मुले नवीन भाषा चटकन शिकतात पण मोठयांना एखादी नवीन भाषा शिकायला वेळ लागतो.आमच्या बंधूची केरळला बदली झाली होती तेव्हा तिथे आमची पुतणी तिकडची भाषा चटकन शिकली.कारण ती तेव्हा लहान होती.आमचा नातू लहानपणी कॅनडाहून भारतात आला तेव्हा त्याची भाषा जवळजवळ इंग्लिशच होती व त्यानंतर ते ते गोव्याला स्थायिक झाले तेव्हा तो कोंकणी भाषा देखील चटकन शिकला. आता मी हे का सांगतो आहे कारण मला तुम्हाला हे सांगायचे आहे की लहान मुले तुम्ही जे शिकवाल ते चटकन शिकतात.त्याचे कारण लहान मुलाचे बहिर्मन हे अगदीच शून्य असते व अंतर्मन मात्र कार्यरत असते.त्यामुळे तुम्ही त्याला जे काही लहाणपणी सांगता व शिकवता ते त्याच्या सोबत आयुष्यभर कायम स्वरूपी असते.कारण ते तेव्हा त्याच्या अंतर्मनात गेलेले असते.आपण महाराष्ट्र गुजरात किंवा महाराष्ट्र कर्नाटक असा सीमाप्रश्न असे म्हणतो आणि महाराष्ट्रातून गुजरात मध्ये प्रवेश केला असे म्हणतो पण जमिनीला विचारलेत तर ती म्हणेल कसला गुजरात.जमिनीला हे नाव वगैरे काहीच ठाऊक नसते.तिला ही नावे माणसाने दिलेली आहेत.हे ही काल्पनिक आहे हे लक्षांत घेतले तर या कल्पनेचा इतका प्रभाव आहे की या कल्पनेनेच सर्व गोंधळ घातलेला आहे.कोकणी भाषेत सांगायचे तर अक्षरश: धुमशान घातलेले आहे.कल्पनेने धुमशान घातलेले आहे.त्यामुळेच जगात हाणामारी दंगेधोपे हे सगळे चाललेले असते.मानवजात हया काल्पनिक गोष्टींमुळे विभागली गेलेली आहे.जात, धर्म, वर्ण, कुळ, गोत्र हया सर्व गोष्टी त्याला चिकटल्या गेलेल्या आहेत.जीवनविद्या काय सांगते लहान मुलाला मानवी संस्कृतीचे संस्कार द्या.आज त्याला निरनिरळ्या संस्कॄतीचे संस्कार दिले जाता.हिंदु संस्कृती, मुस्लीम संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, पारशी संस्कृती, बौध्द संस्कृती अशा निरनिराळ्या संस्कृतीचे संस्कार त्याला दिले गेल्यामुळे मानवजात आज विभागली गेलेली आहे.त्यातून पुढे माणूस विभागला जातो.हे विभाजन काल्पनिक असले तरी माणूस विभागला जातो हे मात्र  खरे.वर्णामुळे प्रांतामुळे,राष्ट्रामुळे माणूस विभागला जातो.मानवजातीची ही जी विभागणी झालेली आहे ती सोयीसाठी केली गेली हे ठीक आहे किंबहूना ती सोयीसाठीच आहे पण आज ती गैरसोय झालेली आहे.