शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

निसर्गाच्या सान्निध्यात दुर्भावना होतात दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 5:32 AM

- ब्रह्मकुमारी नीता वायू हे वेगाचे प्रतीक आहे. धूळ, माती, कचरा याला उडवून लावण्याची, फेकण्याची शक्ती आहे. जीवनामध्ये जेव्हा ...

- ब्रह्मकुमारी नीतावायू हे वेगाचे प्रतीक आहे. धूळ, माती, कचरा याला उडवून लावण्याची, फेकण्याची शक्ती आहे. जीवनामध्ये जेव्हा समस्या येतात तेव्हा त्यांना वाऱ्यासारखे उडवून लावण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. विचारांचा कचरा रोज मनातून फेकण्यासाठी, घालवण्यासाठी वायूसमान वेग धरण्याची कला आपण आत्मसात करावी. प्रकृतीचे सान्निध्य विचारांना नवजीवन देते. भारतभूमीवर कितीतरी योगी, तपस्वी, साधू होऊन गेले ज्यांनी निसर्गाशी सुसंवाद साधून परमात्म सुखाची प्राप्ती केली. निसर्गाची सोबत मनुष्याला विनाशी इच्छांपासून दूर घेऊन जाते. स्वसंवाद साधण्यासाठी मदत करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य ‘ध्यान साधना’चे महत्त्व समजत आहे. पण ध्यान करण्यासाठी स्वत:ला एखाद्या खोलीत बंद करून बसण्याची गरज नाही. मनाला मुक्ततेचा अनुभव करायचा असेल तर प्रकृतीचा सहवास करावा. ध्यानधारणा करताना खूपदा संगीत लावले जाते. ज्यामध्ये लाटांचा, वाºयाचा किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकतात आणि त्या अनुसार चित्रीकरण करत करत मनाला एकाग्र केले जाते. पण जर निसर्गाचे सान्निध्य मिळाले तर मनातल्या दुर्भावना दूर करण्यास, स्वत:ला परिवर्तन करण्यास मदत मिळते, असंभव वाटणाºया सर्व गोष्टी सहज संभव वाटू लागतात. एक प्रकारची वेगळीच ऊर्जा आपल्यात निर्माण होते आणि त्याला लाभ होतो. आपल्या या वेगवान जीवनाला थोडे संथ करण्यासाठी, मनाचे उधाण कमी करण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी सर्वांगसुंदर निसर्गाशी संवाद साधा. मग बघाच कसे जीवनाचे रूप कसे पूर्णत: बदलून जाते की नाही?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक