शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
3
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
4
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
5
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
6
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
7
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
8
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
9
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
10
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
11
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
12
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
13
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
14
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
15
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
16
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
17
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
18
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
19
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
20
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जीवन जगताना सत्कर्म करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:01 IST

चातुर्मास विशेष...

सोलापूर : मनुष्य मेला की तो स्वर्गात गेला की नरकात गेला हे त्याच्या अंत्ययात्रेला आलेले लोक मागे त्याच्याविषयी बोलतात यावरुन समजते, असे प्रतिपादन प.पू. गौतममुनी म. सा. यांनी केले.

याविषयी एक विनोदी किस्सा सांगून ते म्हणाले, नरकात कुणालाच जाण्याची ईच्छा नसते, प्रत्येकाला स्वर्गच हवा असतो. यासाठी पृथ्वीतलावर जीवन जगताना सत्कर्म करावे. दुष्टकर्म, दुराचार आपल्या मन, वचन व वाणीतून करणे हे चुकीचे आहे. माणूस चांगला वागला की अंत्ययात्रेत मागे चालणारे लोक चांगलेच बोलतात. सध्या जगण्याच्या पद्धतीत बदल होत असून याबद्दल ते म्हणाले, अतिथी देवो भव: ही आपली संस्कृती आहे. आज मात्र, सीसीटीव्हीच्या कक्षेत आहोत. कुत्र्यापासून सावधान अशा पाट्या आपल्यांना पाहायला मिळतात.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या जीवन कार्याचा त्यांनी दाखला दिला. सद्गुरु हे आपले जीवन सार्थक बनवतात. सज्जनांच्या सहवासात जीवन सद्गुणांनी सजवा. जीवनात जगण्याची कला गुरु आपणास शिकवतात. आपण देवाला पाहू शकलो नाही तरी संत, गुरु हे साक्षात परमात्माच असतात. गुरु नाही तर जीवन सुरु नाही. म्हणून प्रत्येकाने सत्संग, प्रवचनाच्या श्रवणाने संतांकडून शिकावे. संतांचा उपदेश म्हणजे साक्षात ईश्वराचा संदेश असतो. संत हे आपल्यांना परमात्याची भेट घडवितात. नरक हा शब्द उलटा करन असा होतो. कर्णासारखे दानी व्हायला हवे. कारण दानाचे मोठे महत्त्व आहे. दान हा असा शब्द आहे की जो नरकाचे दार बंद करतोे, असेही गौतममुनी यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक