शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 4:56 AM

मनुष्य जीवन अतिदुर्लभ समजले जाते. परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्माचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो.

- ब्रह्माकुमारी नीतामनुष्य जीवन अतिदुर्लभ समजले जाते. परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्माचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो. माणसाला सामाजिक प्राणी मानले जाते. समाज, कुटुंब, प्रकृती अशा अनेक बाबींबरोबर मनुष्याला ऋणानुबंध आहेत. संपूर्ण जीवनच त्या अनुषंगाने चालत आहे. एखादे मूल जन्माला आले की हळूहळू त्याच्यावर मातृऋण, पितृऋण वाढत जातात. हे ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात. कारण हे बांध आपल्याला जीवनाच्या प्रवाहामध्ये कुठे ना कुठे थांबवतात. जोपर्यंत त्याची भरपाई होत नाही तोपर्यंत आपली अजिबात सुटका नाही. आपण सर्वच पावलोपावली अनुभव घेत असतो की कोणतेही बंधन आपल्याला आवडत नाही. परंतु ही बंधने मनाला तसेच आपल्या पूर्ण जीवनाला प्रभावित करतात. सगळ्यांनाच आपल्या मनासारखा जीवनसाथी, नोकरी, कुटुंब मिळत नाही. काही ठिकाणी तडजोड करूनच जीवन व्यतीत करावे लागते. म्हणजेच हे बंध असे आहेत ज्यांनी आपले जीवन बांधून ठेवले आहे. पण सत्य हे आहे कीहे बांध कदाचित आपणच घातले आहेत. कळत नकळत केलेले विचार, बोल, कृती याचाच तो परिणाम आहे. आजच्या युगात ‘गिव्ह अ‍ॅण्ड टेक’ या नियमावर लोक चालत आहेत. कदाचित आपण त्याला आज व्यवसाय म्हणतो. प्रत्येक संबंधामध्ये, मग ते पती-पत्नी, भावंडं, मित्रमैत्रिणी, वडील-मुलगा, चालक-मालक असो. सगळीकडे मी किती केलं आणि त्या बदल्यात समोरच्या व्यक्तीने किती केलं याचा हिशेब लावला जातो. कधी कधी आपण बोलून दाखवत नाही, पण मनातल्या मनात तो हिशेब करण्याची प्रक्रिया सुरूच राहते. अनेकदा ती अव्याहत सुरू असते. काही वेळा तर आपण स्वत:चीच समजूत घालतो की जाऊ दे, कदाचित हे पूर्वजन्माचं देणं असेल जे आज आपण फेडत आहोत. कळत नकळत आपल्याला आपल्या कर्मांचं गूढ लक्षात येतं.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक