शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विकारांचा सहवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 1:46 AM

ज्ञानाची संगत संंस्कार घडवून जागविते व विरक्ती आसक्तीतून सुटका करत असते.

- बा.भो. शास्त्रीआपला मुलगा वा मुलगी हाताच्या बाहेर गेले म्हणून निराश होणारे आईबाप आपण पाहतो. ते हताश होतात. त्यांना दिलासा देणारंं हे सूत्र आहे. जसे आईबाप, जशी शाळा, जसा सहवास तसे संंस्कार त्यांंना मिळतात का? त्याचा ध्वनीचा उच्चार, त्यांंच्या देहबोलीत होणारा बदल लक्षात येतो का? आम्ही मुलांच्या भावभावना समजून घेतो का? हे सगळे प्रश्न आई व बाप यांच्यासाठी आहेत. थोडीशी खराब वस्तू फेकणं शहाणपण नाही. तिला दुरुस्त करायचंं असतंं. टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. प्रदर्शनात त्याच बक्षिसं पटकावतात.

स्वामींंनी त्यांच्या चरित्रात अनेक मळलेली माणसंं उजळून टाकली. सहवासाने उजाळा मिळतो, संंस्काराने जीवनाला आकार येतो. संंसारात वावरताना चुका होतच असतात, धूळ उडतेच, डाग पडणार, मळ लागणारच हे कुणालाही चुकवता येत नाही. कर्माचे डाग लागतच असतात, पण ते धुतलेही जातात. चूक होते ही चूक नाही तर क्षमा मागितली जात नाही ही चूक आहे. आधी आपण राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या सहा विकारांंच्या सहवासात असतो. हे सहाही विकार आपल्याबाहेर नसून आपल्यातच असतात.

हा आतला सहवास आहे. त्यातून ज्याचा आपल्यावर प्रभाव पडतो आपण तसेच होऊन जातो व तशाच लोकांंचा संंग आपल्याला आवडतो. त्यांच्या गुण तसेच अवगुणांचा आपण अजिबात विचार करीत नाही. जणूकाही आपल्या डोळ्यावर झापडेच लागलेली असतात. हा आतून झालेला फार मोठा बिघाड आहे. याचा खुलासा श्रीचक्रधर स्वामींनी अनेक जागी केलेला आहे. उजळणे म्हणजे चमकून जाणे, चकाकणे, ज्याच्या जीवनात आचाराची शुद्धता व विचाराची परिपक्वता आहे, अशांंंचा संंग स्वामींंना अभिप्रेत आहे. ज्ञात आणि विरक्त हे दोन घटक त्यात महत्त्वाचे आहेत. ज्ञानाची संगत संंस्कार घडवून जागविते व विरक्ती आसक्तीतून सुटका करत असते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक