शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

देह देवाचे मंदिर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 19:11 IST

इंद्रिये हे अत्यंत बलवान आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड असलं तरी आवश्यक आहे.

- प्रा. सु. ग. जाधव

'देहाची आसक्ती ठेवू नका ' असे सांगणारे तथाकथित साधू किंवा संत हे स्वत:च देहाचे चोचले पुरविण्यात मग्न असल्याचे सर्वसाधारणपणे दिसून येते. असे का व्हावे? याचे उत्तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवतगीतेमध्ये दिले आहे. ते म्हणतात की इंद्रिये हे अत्यंत बलवान आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड असलं तरी आवश्यक आहे. मानवी देह हा विविध घटकांपासून अर्थातच पंचमहाभूतांपासून तयार झालेला असल्याने या प्रत्येक भूतांचे गुण देहामध्ये समाविष्ट आहेत. विविध प्रसंगी, विविध कारणामुळे पंचमहाभूतातील एखाद्या भुताचा प्रादुर्भाव जास्त होऊन प्रकृतिस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. देहाची जडणघडण सूक्ष्मपणे पाहिल्यास यामध्ये विविध विरोधी गुण असलेले घटकसुद्धा एकोप्याने नांदत असल्याचे आपल्याला दिसून येते. जसे पृथ्वी, आप, पेज, वायु आणि आकाश. या सर्वांचा उद्देश एकच की देहधारण करणाऱ्या जीवात्म्यास उच्चगती प्राप्त व्हावी आणि परमात्म्याचे सान्निध्य प्राप्त व्हावे. परंतु, बहुतांश सामान्य माणसांना आपण कशासाठी जन्मलो याचा विसर पडतो. ही माणसे देह पोषणामध्येच आपले आयुष्य व्यतीत करतात. अशांना ज्ञानेश्वर माऊलींनी 'ज्ञानहीन' असे म्हटलेले आहे.  ते म्हणतात-

‘शून्य जैसे गृह का  चैतंन्यविन देह तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीना’ (ज्ञा. ४..४०. १९४)

देहामधील चैतन्य निघून गेल्यानंतर  हा देह रिकाम्या असलेल्या घरासारखे होते.  त्याचप्रमाणे संमोहित झालेला  व्यक्ती ज्ञानहीन होतो आणि अशा ज्ञानहीन व्यक्तीला स्वकर्तव्य साधण्याचे विवेक राहत नाही. आपल्याला प्राप्त झालेले हे शरीर  एक दिवस टाकून जायचे आहे,  पंचमहाभूतातील प्रत्येक घटक आपल्याला परत करायचा आहे, याचे भान न राहिल्यामुळे अनर्थ होतो अर्थातच अशावेळी देह दु:खाचा डोंगर वाटू लागतो.  म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात- 

मग मेरूपासूनी थोर ेदेह दु:खाचेनि डोंगर दाटिजो पा परिभारे चित्त न दटे (ज्ञा.६.२२. ३६९)

त्या व्यक्तीला दु:खाचा पारावार राहत नाही. यावर उपाय सांगताना काही जण देह त्याग करा असं म्हणतात. देह त्याग करणे म्हणजे आजच्या भाषेत आत्महत्या करणे होय. हे चुकीचे आहे.  या देहाला माऊलीनी 'खोळ' अर्थात पिशवी मानून आपण आपल्या जागी राहावे, असे म्हटले आहे. याबाबत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -

ते देह झोळ ऐसे मानुनि ठेले आपणचि आपण होऊनि जैसा मठ गगना भरुनी गगनची असे  (ज्ञा.८.५. ६०)

ज्याप्रमाणे मठामध्ये गगन भरून असतो आणि मग मठ फुटल्यावर  तो गगनात विलीन होतो.  त्याप्रमाणे देहाची आसक्ती न ठेवता त्याकडून  ध्येयप्राप्ती करून घेतली पाहिजे.  मनुष्याला सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती म्हणजे मृत्यूची.  कारण मृत्यू म्हणजे आपण संपलो,  ही धारणा सर्वसाधारणपणे माणसांमध्ये दिसून येते. अशा व्यक्ती स्वत:ला 'देह'  समजत असतात आणि ध्येयाकडे दुर्लक्ष करीत असतात.  अशा व्यक्ती आयुष्यभर देहपोषणासाठी विविध वस्तूंचा संग्रह करीत राहतात. अनेकवेळा तर त्यांना त्या वस्तूचा उपयोगही करता येत नाही.  मृत्यूप्रसंगी मात्र काहींना उपरती होते. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशावेळी त्या देहाकडून काहीही होणे शक्य नसते तरीही परंतु जर त्या व्यक्तीचा निर्धार असेल तर पुढच्या जन्मी देह धारण करून परमेश्वरप्राप्तीचा करून घेऊ शकतो.  म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे

तरी आता देह असो अथवा जाओ आम्ही तो केवळ वस्तूची आहोे का जे दोरी सर्पत्व वावो दोराचीकडूनिे (ज्ञा.८.२७. २४८)

देह जावो किंवा राहो आपण केवळ वस्तू अर्थात आत्मतत्त्व आहोत हे लक्षात ठेवावे.  यासाठी माऊलीने दृष्टांत दिला आहे की थोडा अंधार, थोडा प्रकाश अशावेळी दोरीलाच आपण साप समजून घाबरतो परंतु प्रकाश पडल्यानंतर तो साप नसून दोरी आहे याचे ज्ञान होते. असे झाल्यावर पुन्हा आनंद वाटतो.  म्हणून देह जाण्याची भीती वाटणे ही बाब म्हणजे दोरीवर साप दिसणे यासारखे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष न करता त्याचा उपयोग प्रगतीसाठी करणे, हेच मानवाचे मुख्य कर्तव्य आहे.

(लेखक यशवंत महाविद्यालय नांदेड येथे प्राध्यापक, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे सचिव आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक