शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आनंद तरंग: कवटीतल्या वह्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 2:53 AM

अभद्र विचारांची पाने खोडरबराने पुसून टाकून त्यावर पक्क्या शाईने आपले विचार आत्मविश्वासाने लिहितात आणि या जगात जिंकण्याचा नवा विक्रम निर्माण करीत राहतात.

विजयराज बोधनकर

निसर्गाने प्रत्येक माणसाला कवटी नावाचं कपाट दिलंय. त्या कवटी नावाच्या कपाटात न संपणाऱ्या कोºया वह्या नियतीने जन्मासोबतच पाठवून दिल्यात. त्या कपाटातल्या कोºया वह्यांवर ज्ञानाने, कर्माने, अनुभवाने ज्याने ज्याने उत्तम लिहून काढलं आणि त्याचा आयुष्यात वापर केला, त्या अनुभवी ज्ञानाचा उपयोग करून नाव मिळवलं, संपत्ती मिळविली आणि जगालाच पुन्हा ज्ञानरूपाने परतही केलं, त्या त्या माणसांचं जगणं सफल झालं आणि त्याच कपाटातल्या अनेक कोºया वह्यांना आपण मेंदू म्हणतो. याउलट ज्यांनी जन्माला येऊन कपाटातल्या मेंदू नामक वह्या कोºयाच ठेवल्यात ते केवळ आणि केवळ दुर्दैवीच ठरलेत. या कवटी नामक कपाटाला साफसूफ केलं नाही तर दारिद्र्याचे जाळे, जळमटे लागतात, त्यातून उग्रता प्रकटू लागते, वह्यांना वाळवी लागते. मग वाळवी लागलेल्या मेंदूनामक वह्या क्षीण होत जातात, अपयशाला कवटाळून बसतात. दुर्दैवी जगण्याच्या चिखलात हळूहळू रूतत जातात. असे होऊ नये म्हणून अनेक जागृत माणसे त्या कपाटातल्या वह्यांची साफसफाई करतात. अभद्र विचारांची पाने खोडरबराने पुसून टाकून त्यावर पक्क्या शाईने आपले विचार आत्मविश्वासाने लिहितात आणि या जगात जिंकण्याचा नवा विक्रम निर्माण करीत राहतात. कपाटातली प्रत्येक वही कोरीच असते, त्यावर आपण जे लिहू त्याला नियती तथास्तू म्हणत असते. मग उत्तम असेल तर उत्तम घडत जातं. अशुभ असेल तर अशुभच घडत जातं. प्रत्येकाने मात्र हेच ठरवायचं की नेमकं आपण लिहायचं तरी काय? कवटीतल्या वह्यांवर दुर्योधनाने क्रोधाच्या, मत्सराच्या, लोभाच्या कविता लिहिल्यात, रावणाने अहंकाराच्या, कामवासनेच्या कविता लिहिल्यात, कंसाने सिंहासनासाठी हत्येच्या कविता लिहिल्यात, नियतीने त्यांना अडवलं नाही. त्यांचा शेवट तसाच होऊ दिला. आपलाही शेवट कसा असावा हे फक्त आपणच ठरवू शकतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक