शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

सहनशील बनू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 6:33 AM

कितीतरी प्रकल्प राबविले जातात. त्यासाठी या धरतीमातेची चिरफाड केली जाते, या सर्वांना प्रेमाने सहन करून नेहमीच विशाल हृदयामध्ये आपल्या लेकरांना सामावून घेते.

कितीतरी प्रकल्प राबविले जातात. त्यासाठी या धरतीमातेची चिरफाड केली जाते, या सर्वांना प्रेमाने सहन करून नेहमीच विशाल हृदयामध्ये आपल्या लेकरांना सामावून घेते. सर्वांची भूक भागविण्यासाठी उत्पादन करत राहते. सामावून घेणे आणि सहन करण्याची अफाट क्षमता या धारांमध्ये दिसते. आपण ही सहनशील बनून सर्वांना सामावून घेऊ या.

सागर : ‘जल हेच जीवन’ मानले जाते. जर मनुष्याच्या जीवनामध्ये पाण्याचा अभाव असेल, तर पूर्ण जीवन विस्कळीत होते. मनुष्य अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो, परंतु पाण्याशिवाय जगणे कठीण. जमिनीला सुपीक बनविण्यासाठीसुद्धा पाण्याची गरज लागते. शरीरामध्ये ७0 टक्केपेक्षा जास्त पाणी राहते. पाण्याची मात्रा कमी झाली की, शरीराच्या कार्यपद्धतीमध्ये बिघाड होतो. त्वचेवरही त्याचा परिणाम होतो. जल तत्त्व किती महत्त्वाचे आहे, हे तर आपण सर्व जाणतोच. पाणी शीतलतेचे प्रतीक आहे, पण पाणी जर उफाळून आले, तर सर्व सृष्टीला उद्ध्वस्त ही करू शकते. सृजन आणि संहार या दोन्ही गोष्टी दिसून येतात.

अग्नी : पवित्रतेचे प्रतीक आहे. अग्नीमध्ये वस्तूला परिवर्तन, तसेच पवित्र करण्याची शक्ती आहे. प्रत्येक शुभकार्यामध्ये अग्नीचे विशेष स्थान दिसून येते. जसे लोखंडाला अग्नीमध्ये टाकले, तर ते मोल्ड होऊ शकते, सोन्याला आगीत टाकले, तर त्याच्यातली खाद नष्ट होते. परिवर्तन करण्याची, स्वच्छ करण्याची क्षमता या अग्नी तत्त्वामध्ये आहे.

आकाश : विशालतेचे प्रतीक आहे. जेव्हा कधी आकाशाकडे लक्ष जाते, विचारांमध्ये विशालता येते. मन काही कारणाने संकुचित झाले असेल, ते विशाल बनविण्यास मदत मिळते.ब्रह्मकुमारी नीता