Next

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत समुद्राचे पाणी शिरले घरांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 04:47 PM2017-12-05T16:47:13+5:302017-12-05T16:47:34+5:30

दापोली - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावात घरात समुद्राचे पाणी घुसले आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या घरांना धोका निर्माण ...

दापोली - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावात घरात समुद्राचे पाणी घुसले आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना  जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. रात्री समुद्राच्या उधणाचे पाणी घरात घुसल्याने लोकांनी रात्र जागून काढली. समुद्र किनाऱ्यावरील घरांना समुद्राच्या पाण्याचा वारंवार धोका उदभवत असल्याने समुद्र किनारी धूप प्रतिबंधक बंधारा व्हावा, अशी मागणी होत आहे, मात्र प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत आहे.