भाताबरोबर रब्बी हंगामही हातून गेल्याने बळीराजावर दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:00 AM2018-11-25T01:00:41+5:302018-11-25T01:00:53+5:30

शेतकरी भयभीत : सोसायट्यांचे भूत मानगुटीवर बसणार

Due to the rabi season loss, the double crisis on the victims | भाताबरोबर रब्बी हंगामही हातून गेल्याने बळीराजावर दुहेरी संकट

भाताबरोबर रब्बी हंगामही हातून गेल्याने बळीराजावर दुहेरी संकट

Next

वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. येथील जमीन पाणी धरून ठेवणारी असल्याने इथे भाताच्या जोरावर शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो. यावर्षी मात्र ऐन हंगामात पाऊस निघून गेल्याने भात पिकाबरोबर रब्बी हंगामही शेतकऱ्याच्या हातून निसटून गेल्याने शेतीसाठी घेतलेले सोसायट्यांचे कर्ज फेडायचे कसे या चिंतेने तो ग्रस्त झाला आहे.


भाता खालोखाल सुमारे १००० हेक्टर क्षेत्रात कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये हरभरा, वाल, तूर, चवळी, तील, धने, मोहरी, उडीद, राई आदी पिके दरवर्षी घेतली जातात. यावर्षी मात्र पाऊस गेल्याने कडधान्याचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे.


शिवाय येथे बारमाही वाहणाºया पाच नद्या आहेत. मात्र सिंचनाच्या कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याने येथील शेतकºयाला आधुनिक शेती करता येत नाही. आजही तो पारंपरिक पद्धतीनेच शेती करतो.


यावर्षी पाऊस गेल्याने भात शेती मोठ्या प्रमाणात करपून गेली आहे. त्यामुळे येथील शेतकºयांनी उभी पिके स्वत:च्या हाताने पेटवून दिलीत. तरी आणे वारी साठी प्लॉट निवडतांना जिथे पाण्याचे प्रमाण जास्त आहे. उत्पन्न चांगले आहे. त्याचीच निवड केली. मात्र नियमाप्रमाणे हळवे, निमगरवे, गरवे अशा भाताच्या जाती घेणे बंधनकारक असतांना तसे न करता एकाच प्रकारचे उत्तम पिक येणारे भात घेऊन विमा कंपनीच्या फायद्यासाठी शेतकºयांची दिशाभूल करून फसवी आणेवारी जाहीर केल्याने. वाडा तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यात समाविष्ट होऊ न शकल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

विमा कंपन्यांसाठी दिला शेतकºयांचा बळी
यासंदर्भात शेतकरी नेते प्रफुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. विमा कंपनीच्या फायद्यासाठीच प्रशासनाने शेतकºयांचा बळी दिला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली तर तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांच्याशी संपर्क साधला असता यावर्षी पाऊस लवकर गेल्याने रब्बी पिकांमध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांनी घट झाली असल्याचे सांगून रब्बीची एकूण किती पिके घेण्यात आल्याची माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. तसेच फोनवर घेतलेली प्रतिक्रि या प्रसिद्ध करू नये असे सांगितले.

Web Title: Due to the rabi season loss, the double crisis on the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी