भूमिगत जलवाहिनीमुळे पाणीप्रश्न निकाली निघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:17 PM2019-04-21T22:17:33+5:302019-04-21T22:17:54+5:30

शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते.

The water problem will be removed due to the ground water channel | भूमिगत जलवाहिनीमुळे पाणीप्रश्न निकाली निघेल

भूमिगत जलवाहिनीमुळे पाणीप्रश्न निकाली निघेल

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस : निवडणूक विभागाला विनंती करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते. परंतु, त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. शिवाय सध्या जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे पाणी समस्येचा विषय आचार संहितेतून वगळावा अशी विनंती आपण निवडणूक विभागाकडे करणार असल्याचे खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले आहे.
वर्धा शहराला महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पिण्याची उचल करून त्याच पाण्याचा पुरवठा शहरातील नागरिकांना केल्या जातो. हा पुरवठा होत असताना महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत संपूर्ण पाणी नदीपात्रातून मार्गक्रमण करते. २६ ते ३० किमी नदी पात्रातून पाणी मार्गक्रमण करीत असताना मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. हेच बाष्पीभवन टाळण्यासाठी तसेच वर्धा शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीला नविन तंत्रज्ञानाची जोड देऊन भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणल्यास भविष्यात फार मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल.
महाकाली धाम प्रकल्पातून वर्धा न.प. ला ५.७९ दलघमी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ४.१८ दलघमी, मध्ये रेल्वे विभागाला १ दलघमी, एमआयडीसीसाठी २.४० दलघमी इतका पाणीसाठा आरक्षीत ठेवण्यात आला आहे. महाकाली धाम प्रकल्पाचे एकूण क्षमता ३२८.६०० दलघमी असून सध्या अतिशय अल्प उपयुक्त जलसाठा या जलाशयात शिल्लक आहे.
पर्जन्यमान दरवर्षी बदलत असते कधी जास्त तर कधी कमी राहते. भविष्यात भूमिगत जलवाहिनीद्वारे धाम प्रकल्प ते येळाकेळीपर्यंत कायम स्वरूपी पाणी आणल्यास पाण्याचीही बचत होणार आहे. याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येत कार्य करण्याची गरज असल्याचे तसेच जिल्हा प्रशासनानेही याविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज खा. रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा
वर्धा शहरातील व परिसरातील ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याविषयी प्रशासनानेही गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे खा. तडस यांचे म्हणणे आहे.

Web Title: The water problem will be removed due to the ground water channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.