धूम्रपान करणारी युगुले लावतात आग, येऊरचा वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 03:12 AM2018-03-25T03:12:18+5:302018-03-25T03:12:18+5:30

येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 Smokeing couples get rid of fire, junk mail | धूम्रपान करणारी युगुले लावतात आग, येऊरचा वणवा

धूम्रपान करणारी युगुले लावतात आग, येऊरचा वणवा

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याखेरीज, प्राण्यांची शिकार करणारे शिकारी सावज जाळ्यात येण्याकरिता हेतुत: आग लावतात, असेही निदर्शनास आले आहे.
संजय गांधी राष्टÑीय उद्यान, येऊरचे जंगल आणि शहापूर, मुरबाड तालुक्यांतील अभयारण्यात पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी धूम्रपान करून थोटके वाळलेल्या गवतावर बिनदिक्कत फेकून देतात. याखेरीज, एकान्तवासाकरिता येथे येणाºया प्रेमीयुगुलांकडूनही धूम्रपान केले जाते आणि आग लागते. अनेक तरुणतरुणी येऊरच्या परिसरात एकान्तात जाऊन प्रेम करण्याबरोबरच धूम्रपान करतात, असे निदर्शनास आले आहे. सिगारेट पेटवल्यावर सहजपणे फेकून दिलेली काडी किंवा अर्धवट जळालेली सिगारेट सुकलेल्या गवतावर टाकल्याने जंगलातील वणव्याच्या घटना वाढत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. येऊरच्या जंगलात जाऊन सशासारख्या प्राण्यांची शिकार करून मांस-मदिरेवर ताव मारण्याचे प्रकार वाढले आहेत. ससे पकडण्याकरिता ससा लपून बसलेल्या गवताला हेतुत: आग लावली जाते. यामुळे भयभीत झालेला ससा बाहेर येतो व मग त्याला मारले जाते. शिकारीकरिता लावलेली आग काहीवेळा हवेमुळे पसरते व मोठ्या प्रमाणावर वृक्ष व वनसंपदेची हानी करते, असे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
येऊरच्या जंगलातील ‘गोल्डन फार्म कण्ट्री’च्या जवळपास शनिवारी दुपारी वणवा पेटला. दोनचार दिवसांपूर्वी मुलुंड परिसरातील पाइपलाइनजवळ पडलेल्या ठिणगीतून संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या परिसरात वणवा पेटून शेकडो वृक्ष जळून खाक झाले. मुंबई, ठाण्याच्या आसपास असलेल्या जंगलातील वणव्याच्या धुराच्या लोटांमुळे ठळक बातम्या होतात. मात्र, शहापूरच्या भातसा, तानसा अभयारण्यात व मुरबाड, माळशेजच्या जंगलात पर्यटकांच्या बेपर्वाईमुळे गेल्या काही दिवसांपासून वणव्याच्या घटना घडत आहेत. मागील दोन महिन्यांत वणव्याच्या शेकडो घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. कडकडीत उन्हामुळे झाडांचा पालापाचोळा, गवत वाळलेले आहे. त्यावर एक ठिणगी पडण्याचा अवकाश लागलीच आग प्रज्वलित होते. आग लागल्यावर जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळणाºया प्राण्यांच्या पावलांसोबत आग अन्यत्र पसरते. मुरबाड, शहापूर आदी भागांत गेल्या काही वर्षांत रिसॉर्ट, बंगले यांचे पेव फुटले आहे. तेथे वरचेवर पार्ट्यांकरिता मुंबई, ठाण्यातून पर्यटक जातात. शिकार करून मांस खाण्याकरिता शिकारी बिनधास्त आग लावून मोकळे होतात. भातशेती करणाºया शेतकºयांकडून राबसाठी शेती जाळण्यात येते. यातील ठिणगी उडून वणवा लागतो, अशी माहिती वन्यजीव प्राणी संरक्षक अधिकारी ईशांत कांबळी यांनी सांगितले.

हवा खायला येणाºयांचेही प्रबोधन हवे
रात्रीबेरात्री जंगलात धूर दिसताच वनअधिकारी येऊरच्या जंगलात धाव घेतात. मात्र, जोपर्यंत पार्टी करणाºया पर्यटकांना आवर घातला जात नाही, तोपर्यंत आग लागण्याच्या घटना घडणारच, असे वनीच्यापाड्यातील रहिवासी लक्ष्मण खंडारे व पाटीलपाड्यातील नरेश मोरगे यांनी सांगितले. वनअधिकारी जंगल परिसरात असलेल्या पाड्यांच्या रहिवाशांमध्ये वणवा लागू नये व लागल्यास तो रोखण्याबाबत जनजागृती करत असल्याचे खंडारे यांनी सांगितले. शहरातून जंगलाची हवा खाण्यासाठी येणाºयांमध्येही जनजागृती करण्याची गरज असल्याचे नितेश पांचोली यांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत वणव्यात वन्य प्राण्यांचा जीव गेला नाही, असे पांचोली यांनी सांगितले.

Web Title:  Smokeing couples get rid of fire, junk mail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे