सांगली जिल्ह्यात हजारवर वाड्या-वस्त्या तहानलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:07 PM2019-04-28T23:07:32+5:302019-04-28T23:07:37+5:30

सांगली : गेल्या आठवड्यापासून जिल्हाभर विक्रमी तापमानाची नोंद होत असतानाच, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. यामुळेच ...

Thousands of Thousands thirsty in Sangli district | सांगली जिल्ह्यात हजारवर वाड्या-वस्त्या तहानलेल्या

सांगली जिल्ह्यात हजारवर वाड्या-वस्त्या तहानलेल्या

Next

सांगली : गेल्या आठवड्यापासून जिल्हाभर विक्रमी तापमानाची नोंद होत असतानाच, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. यामुळेच उपलब्ध जलस्रोतही आटत असून, पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरच्या भरवशावर राहावे लागत आहे. जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये, तर १०७१ वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तापमानातील वाढ अशीच कायम राहिल्यास पाण्याची मागणी अधिक वाढणार आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. उन्हाळ्याचे चार महिने आव्हानात्मक ठरणार, असेच चित्र त्यावेळी होते. आता मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात वळवाच्या पावसांना सुरुवात होते, तर जूनमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित असते. गेल्या तीन वर्षातील पावसाची गती बघितली, तर वळवाचे पाऊस दमदार होत असले तरी संपूर्ण मान्सून अपवाद वगळता कोरडा जात आहे.
जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई अधिक जाणवत आहे. म्हैसाळ योजनेतून काही भागात पाणी पोहोचले असले तरी त्याचा संपूर्ण तालुक्याला फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे जत तालुक्यातील ८६ गावे व ६५० वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाच्यावतीने तालुक्यात चारा छावणीही सुरू करण्यात येणार आहेत. अगदी हीच स्थिती आटपाडी तालुक्यात असून, टेंभूचे पाणी शिवारात आले असले तरी, टंचाई कायम आहे.

तालुका टॅँकर गावे वाड्या बाधित लोक संख्या
जत १०३ ८६ ६५० २१५१३०
क.महांकाळ १३ १९ ९६ २४२६६
तासगाव ११ २२ ९२ २६६८४
मिरज ५ ८ १६ २०९१४
खानापूर १४ १२ १ १९६१३
आटपाडी ३३ २६ २१६ ५०३८१
एकूण १७९ १७३ १०७१ ३५६९८८

Web Title: Thousands of Thousands thirsty in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.