शिक्षकांचा भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनास दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 02:51 AM2017-11-05T02:51:02+5:302017-11-05T02:51:08+5:30

प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती.

Grand Frontier of teachers; Statement given to District Administration | शिक्षकांचा भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनास दिले निवेदन

शिक्षकांचा भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनास दिले निवेदन

Next

अलिबाग : प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती. जिल्हा प्रशासनाने आंदोलकांची अडचण होऊ नये, यासाठी निवेदन घेण्याची व्यवस्था केली होती. या आधीही राष्ट्रवादी काँग्रेसने सुट्टीच्याच दिवशी आंदोलने केली होती. त्यात आता शिक्षकांच्या आंदोलनाची भर पडली आहे.
सकाळी ११.३०च्या सुमारास शहरातील क्र ीडाभुवन येथून शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने आपला मूक मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हिराकोट तलावाजवळ अडविल्याने त्यांनी दोरदार घोषणाबाजी करण्यास सुरु वात केली. या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केले. निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करण्यात यावा, शिक्षकांना करावी लागणारी सर्व आॅनलाइन कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा आॅपरेटरची नेमणूक करावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, बदली इच्छुक असलेल्या सर्व शिक्षकांना बदली मिळाली पाहिजे; परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये, म्हणून २७ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयात आवश्यक त्या दुरु स्त्या व सुधारणा करून बदल्या मे २०१८मध्ये करण्यात याव्यात, एमएससीआयटीसाठी मार्च २०१८पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने सर्वच शैक्षणिक उपक्र म आणि शिक्षकांची मेहनत वाया जात आहे. प्राथमिक शैक्षणिक उपक्रमाचे विविध प्रयोग राबविण्याचे फर्मान म्हणजे सरकारचे चुकीचे धोरण आहे. तसेच सरकार सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मुलांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके देत आहे. पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत शासन दुजाभाव करीत नाही; परंतु गणवेश वाटपात मात्र शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला. या वेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय निजापकर, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, सोपान चांदे आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.

शासनाची संकल्पना योग्य
शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन राबवत असलेल्या संकल्पना योग्य आहेत. या संकल्पना राबविण्यासाठी शिक्षकांना संधी देणे गरजेचे असल्याचे सुर्वे यांनी सांगितले. शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने शिक्षकांची मेहनत वाया जातेय.

Web Title: Grand Frontier of teachers; Statement given to District Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक