पीक विम्यातील अटीचा अडसर, जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी नुकसानभरपाईपासून राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:53 AM2017-11-22T02:53:27+5:302017-11-22T02:54:34+5:30

अलिबाग : सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही.

The condition of the crop insurance policy, 16 thousand 9 7 farmers in the district will be denied compensation | पीक विम्यातील अटीचा अडसर, जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी नुकसानभरपाईपासून राहणार वंचित

पीक विम्यातील अटीचा अडसर, जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी नुकसानभरपाईपासून राहणार वंचित

Next

आविष्कार देसाई 
अलिबाग : सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही. याविरोधात सरकारवर चौफेर टीका होत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विम्याची अट मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी सुमारे तीन कोटी ४८ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहेत.
अर्थव्यवस्थेचा कणा असणाºया कृषी क्षेत्रातील शेतकºयांना दिलासा देण्याची तयारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाने केली आहे. यासाठी त्यांनी सरकारच्याच निर्णयाचा आधार घेत निर्णय क्षमतेतील योग्य समय सूचकता त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांनी तयार केलेल्या अहवालामुळे बाधित शेतकºयांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळण्यातील मार्ग मोकळा झाला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जुलै ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वारे झाले होते. त्यामुळे ३३ टक्क्यापेक्षा अधिक जिराईत पिकांना फटका बसला होता. आपत्तीमुळे १५ तालुक्यातील २४७ गावांतील १६ हजार ९७ शेतकरी बाधित झाले होेते. त्यांचे क्षेत्र हे चार हजार ६४० हेक्टर एवढे होते. शेतीवर आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकºयांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे होते. १६ हजार ९७ शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा काढलेला नाही. झालेल्या पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी सुमारे तीन कोटी ४८ लाख रुपयांची गरज असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाने सांगितले. त्यासाठी त्यांनी अहवालही तयार केला आहे, परंतु ही नुकसानभरपाई देताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाºया विम्याच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम असावी असा निकष अवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी ग्राह्य धरावी, असा सरकारचाच निर्णय आहे.
जिल्ह्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाल्याने प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभच विमाधारक शेतकºयांना मिळणार नाही. त्यामुळे योजनेचा निकष नुकसानभरपाई देण्यासाठी अडसर ठरत आहे.
>योजनेचा लाभ शेतकºयांना मिळणार नाही
जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये २०१६ साली ३० हजार २७४ शेतकरी समाविष्ट झाले होते. त्याचे क्षेत्र हे २२ हजार १६४.१७७ हेक्टर होते. त्यासाठी एक कोटी ७२ लाख ८७ हजार ७५४ प्रीमियम भरण्यात आला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाले असल्यास तेथे प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ तेथील शेतकºयांना मिळणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभही आता विमाधारक शेतकºयांना मिळणार नसल्याचे समोर आले आहे.
>तीन कोटी ४८ लाखांची गरज
अवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे नुकसान झालेल्या १६ हजार ९७ शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी. यासाठी ढोबळ तीन कोटी ४८ लाख रुपयांची गरज असल्याचा अहवाल तयार केला आहे. यासाठी त्यांनी २००९ च्या सरकारी निर्णयाचा आधार घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना तेवढा, तरी दिलासा देण्याचा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले.
>२०१६मध्ये आपत्तीमुळे १५ तालुक्यांतील २४७ गावांतील १६ हजार ९७ शेतकरी बाधित झाले होेते.
कृषी विभागाने तयार केलेला प्रस्ताव
तालुका गावांची बाधित एकूण बाधित अपेक्षित निधी
संख्या शेतकरी क्षेत्र (हेक्टर) (रुपये लाखात)
अलिबाग २२ १०६७ १५२.६७ ११.४५०
पेण ५४ ९०३८ २६६०.५७ १९९.५४३
मुरुड ०० ०० ०० ००
खालापूर १५ १२१ ३९.६० २.९७०
कर्जत ०६ २१ ८.९३ ०.६७०
पनवेल ३३ ३१४० १०७८.२० ८०.८६५
उरण ०० ०० ०० ००
माणगाव १७ १२८ ६०.०३ ४.५२३
तळा ०९ ३१ २२.३० १.६७३
रोहे २९ १४७३ ३८५.६९ २८.९२७
पाली ३४ ८३७ १९४.६८ १४.६०१
महाड ०३ १० २.५८ ०.१९४
पोलादपूर १४ ६३ ५.२४ ०.३९३
म्हसळा ०४ ११२ १२.८७ ०.९६५
श्रीवर्धन ०७ ५६ १७.३४ १.३०१
एकूण २४७ १६,०९७ ४,६४०.९७ ३४८.०७३

Web Title: The condition of the crop insurance policy, 16 thousand 9 7 farmers in the district will be denied compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी