नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह, साई तेजस प्रतिष्ठाननंही रचले थरावर थर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 11:18 PM2019-08-24T23:18:13+5:302019-08-24T23:21:46+5:30

नवी मुंबईतही दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. नवी मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मोठ्या उत्साहात गोविंदा पथकांनी थरावर थर रचले.(सर्व छायाचित्र- भालचंद्र जुमलेदार)

राज्यातील पूर परिस्थितीमुळे राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंड्या रद्द केल्या. तरी गोविंदा पथकांचा उत्साह मात्र कायम असल्याचं पाहायला मिळालं.

नवी मुंबईतल्या साई तेजस प्रतिष्ठाननंही दहीहंडीसाठी एकावर एक थर लावले होते.

शेकडो गोविंदांनी गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा यांसारख्या गाण्यांवर चांगलाच ताल धरला होता.

अनेक ठिकाणच्या दहीहंड्या रद्द करून दहीहंडीची रक्कम मंडळांनी पूरग्रस्तांना दिली आहे.

एकंदरीतच दहीहंडीचा उत्साह दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळालेला नाही.