प्रेयसी आणि प्रियकराला बंद खोलीत नको त्या अवस्थेत पकडलं; अन् गावकऱ्यांनीच लावलं 'लग्न'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 04:50 PM2023-02-01T16:50:38+5:302023-02-01T16:55:32+5:30

bihar instant love story: बिहारमधील सासाराम येथील एक विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

बिहारच्या सासारामधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. यानंतर गावकऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोघांचे लग्न झाले. हे प्रकरण कारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुबेर टोला येथील आहे.

नोखा येथील कडवा गावातील रहिवासी असलेल्या राम इक्बालचे मागील दोन वर्षांपासून कुबेर टोला, कारघर येथील रहिवासी असलेल्या मधु कुमारी हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोघेही रोज भेटत असत, मात्र काल रात्री प्रेयसी मधुने प्रियकर राम इक्बालला भेटण्यासाठी तिच्या घरी बोलावले होते.

प्रियकर आणि प्रेयसी दोघांना नको त्या अवस्थेत एका खोलीत पकडले असता, एकच गोंधळ सुरू झाला. गावातील लोक जमले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी गावकऱ्यांसह प्रेमी युगुलाला पोलीस ठाण्यात आणले.

खरं तर प्रियकर आणि प्रेयसी दोघेही अल्पवयीन होते. त्यामुळे पोलिसांनीही हस्तक्षेप करणे टाळले. काही वेळातच दोघांची कुटुंबीय तिथे जमा झाली. शेवटी दोघांनीही लग्न करायचे ठरवले.

प्रियकर-प्रेयसीनेही यासाठी होकार दिला. दोघांचे लग्न लावण्यासाठी लोकांनी पोलिसांवर दबाव आणला, परंतु कायदेशीर नियमांमुळे पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ केली. अखेर पोलीस ठाण्यालगत असलेल्या शिवमंदिरात या प्रेमी युगुलाचा हिंदू विधीनुसार विवाह झाला.

यावेळी पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. पंडित यांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला आणि प्रियकर राम इक्बाल याने प्रेयसी मधू एकमेकांचे जीवनसाथी झाले. अशा प्रकारे गेल्या दोन वर्षांपासून गुपचूप भेटणारे हे प्रेमी युगुल आता पती-पत्नी बनले.