जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला.
'सुख सांगावे सकळांसी, दुःखं सांगावे देवासी' अशी आपल्या संतांची शिकवण आहे. समर्थ रामदास स्वामी तर सांगतात, व्यक्ती कितीही परिचयाचा असो, पण 'राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येति तदनंतरे' अर्थात सुरक्षित अंतर आणि मोजका संवाद ठेवलात तर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येणार नाही. कारण आज जी व्यक्ती आपली मित्र आहे ती उद्या आपली शत्रू झाली तर आपली सगळी गुपिते तिला ठाऊक असतात. त्याचा दुरुपयोग भविष्यात केला जाऊ शकतो. म्हणून वैयक्तिक आयुष्याबद्दल कायम मौन पाळावे असे आचार्य चाणक्य देखील सांगतात.