परभणी : हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:53 AM2019-01-14T00:53:01+5:302019-01-14T00:53:37+5:30

पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़

Parbhani: Scarcity of tur Growers without the Center for Guarantee | परभणी : हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट

परभणी : हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट

Next

सत्यशील धबडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़
२०१७ मध्ये तालुक्यातील एकूण ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ मात्र २०१८ मध्ये खरीप हंगामात तुरीच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले़ मानवत मंडळात १२०५ हेक्टर, कोल्हा मंडळात ६६७ हेक्टर तर केकरजवळा मंडळात ९५९ हेक्टर अशा एकूण २ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होता़ मात्र शेवटच्या दीड महिन्यात पावसाने खंड दिल्याने याचा फटका तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांना बसला़ अनंत अडचणींना तोंड देऊन १२ डिसेंबरपासून शेतकºयांनी बाजारपेठेत तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली़ सुरुवातीला तुरीला ४ हजार ७०० रुपये दर मिळाला होता़ त्यामुळे शेतकºयांत नाराजी दिसून येत होती़ निराशेचे वातावरण शेतकºयांत निर्माण झाले होते़ मात्र आता मागील आठवड्यापासून तुरीच्या दरात सतत वाढ होत आहे़ तुरीला बाजारपेठेत ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ आतापर्यंत बाजारपेठेत १८०० क्विंटल आवक झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे़
कापूस उत्पादकही हवालदिल
कापूस वेचणीला दिवाळीच्या अगोदर सुरुवात झाली आहे़ दुष्काळामुळे कामाच्या शोधात अनेकांनी शहराकडे धाव घेतल्याने मजूर मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे़ जे मजूर उपलब्ध आहेत ते वेचणीसाठी जास्तीचा दर मागत आहेत़ ८ ते १० रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागते़
दुसरीकडे कापसाला चांगला दर मिळेल, या आशेने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीकडे पाठ फिरविली आहे़ सुरुवातीच्या काळात कापसाचा दर ६ हजारापर्यंत गेला होता़ मागील आठवड्यात ५ हजार ६८० रुपये कापसाला वरचा दर मिळाला होता़ मात्र तो आता ५ हजार ५७० रुपयांपर्यंत घसरला आहे़ १०० रुपयांनी भाव तुटले आहेत़
१२ जानेवारी रोजी ५ हजार ५७० रुपयांचा कापसाला वरचा दर मिळाला़ यामुळे शेतकरी निराश झाले आहेत़ भाव कमी-जास्त होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ भाव वाढतील, या आशेने अनेक शेतकरी वाट बघत होते़ मात्र प्रत्यक्षात भाव वाढ होत नसल्याने शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाहेर काढताना दिसत आहेत़

Web Title: Parbhani: Scarcity of tur Growers without the Center for Guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.