राहुल गांधींचं लग्न ठरलं?, आमदार अदिती सिंहनं अखेर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 08:33 AM2018-05-07T08:33:45+5:302018-05-07T09:33:52+5:30

राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. 

stories of rahul gandhis marriage is just a rumor aditi singh | राहुल गांधींचं लग्न ठरलं?, आमदार अदिती सिंहनं अखेर केला खुलासा

राहुल गांधींचं लग्न ठरलं?, आमदार अदिती सिंहनं अखेर केला खुलासा

googlenewsNext

लखनौ - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान या दोघांना ''तुम्ही लग्न कधी करणार?'', या प्रश्नाला वारंवार सामोरं जावं लागतं. अशातच, राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राहुल गांधी आणि अदिती सिंह यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे या दोघांचं लग्न होणार असल्याचा दावा काही जण सोशल मीडियावर करत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी, अदिती सिंह आणि त्याच्या परिवारातील काही सदस्य दिसत आहेत. 'राहुल गांधींना अखेर जोडीदार मिळाला. सोनिया गांधी पुढील बोलणी करत आहेत' असे कॅप्शन फोटोला देण्यात आले आहे.

मात्र दुसरीकडे, राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याच्या अफवांचं आमदार अदिती सिंह यांनी खंडन केलं आहे.  याबाबत अदिती सिंह म्हणाल्या आहेत की, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर लग्नाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे मी प्रचंड हैराण झाले आहे. राहुल गांधी केवळ आमच्या पार्टीचे अध्यक्ष नाहीत, तर माझ्यासाठी ते मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांचा खूप आदर करते. माझी आणि राहुल गांधीजी यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे लग्नासंबंधीच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असे सांगत अदिती सिंह यांनी अफवेबाबत खुलासा केला आहे. 

'कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाचं लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. या अफवांमागे कोण असू शकतं, हे तुम्ही ओळखू शकता' असं सांगत अदिती सिंह यांनी विरोधकांकडे बोट दाखवलं आहे.

(जेव्हा भर कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंगनं राहुल गांधींना विचारलं- कधी करणार लग्न?)

वयाच्या 47 वर्षीही राहुल गांधी बॅचलर असल्यानं अनेकदा त्यांना लग्नासंबंधी प्रश्नांचा सामना करावा लागतो. यापूर्वी बॉक्सर विजेंदर सिगनं एका कार्यक्रमात राहुल गांधी यांना सर्वांसमोरच लग्नासंबंधीचा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. विजेंदर सिंग लग्नासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मी नशिबावर विश्वास ठेवणारा आहे, जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा लग्न होईल'.  नवी दिल्लीत पार पडलेल्या पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमादरम्यान विजेंदरनं राहुल गांधींना हा प्रश्न विचारला. यापूर्वीदेखील एका कार्यक्रमात जेव्हा राहुल गांधी यांना लग्नासंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले होते की, 'जेव्हा योग्य मुलगी मिळेल तेव्हा लग्न करणार'.


 

Web Title: stories of rahul gandhis marriage is just a rumor aditi singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.