नक्षलवादी हल्ल्यात १६ गावकऱ्यांची हत्या

By admin | Published: March 3, 2016 04:59 AM2016-03-03T04:59:55+5:302016-03-03T04:59:55+5:30

पोलिसांचे खबरी असल्याचा आरोप ठेवून छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यातील १६ गावकऱ्यांना नक्षलवाद्यांनी ठार मारल्याची माहिती समोर आली आहे.

16 villagers killed in Naxal attack | नक्षलवादी हल्ल्यात १६ गावकऱ्यांची हत्या

नक्षलवादी हल्ल्यात १६ गावकऱ्यांची हत्या

Next

नारायणपूर : पोलिसांचे खबरी असल्याचा आरोप ठेवून छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यातील १६ गावकऱ्यांना नक्षलवाद्यांनी ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. या गावकऱ्यांची हत्या २९ फेब्रुवारी रोजी झाली. मात्र हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या गावकऱ्यांवर खबरी असल्याचा आरोप ठेवून त्यांना नक्षलवाद्यांच्या कांगारू न्यायालयात येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून ठार मारण्याचा निर्णय दिला. पोलिसांना केवळ तिघांचे मृतदेह हाती लागले असून, १३ मृतदेह नक्षलींच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: 16 villagers killed in Naxal attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.