ब्रह्मगिरी संवर्धनासाठी सहा राज्यात उभारणार लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 03:59 PM2021-06-01T15:59:47+5:302021-06-01T16:02:08+5:30

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी फोडण्याचे सध्या काम सुरू असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. सहा राज्यातून गोदावरी नदी वाहत असल्याने या राज्यातील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी यासंदर्भात पुढकार घेतला असून आधी कायदेशीर मार्गाने खोदकाम थांबवणार आणि ते शक्य न झाल्यास सहाही राज्यात लोकचळवळ सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

Fight for Brahmagiri conservation in six states | ब्रह्मगिरी संवर्धनासाठी सहा राज्यात उभारणार लढा

ब्रह्मगिरी संवर्धनासाठी सहा राज्यात उभारणार लढा

Next
ठळक मुद्देराजेंद्रसिंह यांचा पुढकारलोकचळवळ उभारणार

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी फोडण्याचे सध्या काम सुरू असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. सहा राज्यातून गोदावरी नदी वाहत असल्याने या राज्यातील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी यासंदर्भात पुढकार घेतला असून आधी कायदेशीर मार्गाने खोदकाम थांबवणार आणि ते शक्य न झाल्यास सहाही राज्यात लोकचळवळ सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

नाशिक जवळील ब्रह्मगिरीचे खोदकाम हे सहा राज्यावंर परीणाम करणारे ठरणार असून यासंदर्भात मंगळवारी (दि. १) नाशिकमधील पर्यावरण प्रेमी राजेश पंडीत यांनी राजेंद्रसिंह यांच्यासह सहा राज्यातील मान्यवरांशी वार्तालाप आयोजित केला होता.

ब्रह्मगिरीला हानी पोहोचवली जात असताना स्थानिक ग्रामस्थ तसेच येथील मंदिर मठातील संत महात्मे गप्प का असा प्रश्न राजेंद्रसिंह यांनी केला. अशाप्रकारच्या कृत्यात स्थानिक पातळीवर प्रशासन आणि राजकीय लागेबंधे असतात. तसेच येथे तर आत्तापासूनच फॉर्म हाऊस सारखी पर्यटनस्थळे साकारले जात आहेत. त्यास विरोध करण्यासाठी जनचळवळ उभी राहीली पाहिजे असेही राजेंद्रसिंह म्हणाले.

ब्रह्मगिरी केवळ देशाची नव्हे तर आंतरराष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे संवर्धन न केल्यास सहा राज्यांवर त्याचा प्रतिकुल परीणाम होईल. त्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या राज्य घटनेतील तत्वाच्या विरोधातील कृतीला विरोध करण्यासाठी आधी सरकारला निवेदन देण्यात येईल त्यानंतर गरज पडली तर न्यायलयात जनहित याचिका आणि पुढील टप्प्यात लोकचळवळ उभारण्यात येईल असे राजेंद्रसिंह म्हणाले.

Web Title: Fight for Brahmagiri conservation in six states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.