नाशिक जिल्ह्यातील धरणात ५५ टक्के पाणी साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:27 PM2018-02-16T14:27:21+5:302018-02-16T14:29:16+5:30

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे.

55 percent water stock in dams in Nashik district! | नाशिक जिल्ह्यातील धरणात ५५ टक्के पाणी साठा !

नाशिक जिल्ह्यातील धरणात ५५ टक्के पाणी साठा !

Next
ठळक मुद्देऊन वाढताच कमालिची घट : टॅँकरची वाढली मागणी गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर

नाशिक : फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालिची घट सुरू झाली असून, आॅक्टोंबर अखेर सरासरी ९८ टक्के पाणी साठा असलेल्या धरणांमध्ये गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर करण्यात आल्याने सध्या ५५ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण वाढताच पाण्याची टंचाई जाणवू लागणार असून, येवला, मालेगाव व बागलाण या तीन तालुक्यातून फेब्रुवारीतच टॅँकरची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅक्टोंबर अखेर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये सरासरी ९८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो होवून मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यात पाणी सोडावे लागले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील पाण्यावर आरक्षण टाकण्यात येवून त्यानुसार आवर्तने सोडली जात असून, आज अखेर ३६४२३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरण समुहात ७३ टक्के इतके पाणी असून, एकट्या गंगापूर धरणात ७६ टक्के पाणी आहे. कश्यपि धरणात ९५ टक्के तर आळंदीत ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. पालखेड धरण समुहातून पर जिल्ह्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ६४ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात पालखेड धरणात फक्त ४६ टक्के पाणी आहे. दारणा धरणात ७१ टक्के पाणी शिल्लक असून, ओझरखेडला ६८ टक्के पाणी आहे. गिरणा खोºयातील चणकापूरमध्ये ७१ टक्के तर हरणबारीत ६० टक्के व गिरणात ३१ टक्केच पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यात गिरणा धरण दहा वर्षानंतर पुर्णपणे भरले होते. या धरणातील ७० पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यात करण्यात आला आहे.
फेब्रुवारी अखेरपासून सिंचनासाठी असलेले आरक्षण विविध धरणातून सोडण्यात येणार असून, यापुढच्या काळात पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकूण ५५ टक्के पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने आरक्षणाव्यतिरीक्त शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: 55 percent water stock in dams in Nashik district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.