पावसाळ्यातही पाण्यासाठी चढ-उताराच्या पायवाटेने ग्रामस्थांची भटकंती सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:32 PM2019-07-21T12:32:21+5:302019-07-21T12:32:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अककलकुवा तालुक्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अककलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सल्लीबार ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या पाडय़ांवरील हातपंप कोरडेच आहेत. परिणामी ग्रामस्थांना भटकंती करीत डोंगरद:यातून चढ-उताराच्या रस्त्यावरून नदी-नाल्याच्या ङिा:यातून पाणी आणावे लागत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सल्लीबार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोरीवलपाडा येथे सहा हातपंप असूुन त्यातील चार हातपंप आटले तर दोन हातपंप जेमतेम चालत असून अर्धा किलोमीटर अंतरावरून नदीत तयार केलेल्या ङिा:यातून तेथील ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. फाखालपाडा येथील पाचही हातपंप अडीच महिन्यापासून आटल्याने अर्धा किलोमीटर अंतरावरून नदीत खड्डा तयार करून पाणी गाळून पिण्यासाठी आणावे लागते. पाटीलपाडा येथील आठपैकी चार हातपंप आटल्याने ग्रामस्थ नदीतील ङिा:यातून पाणी आणतात. मौलीखेडीपाडा येथील चारपैकी तीन हातपंपांची पाणी पातळी खोल गेली असून एकच हातपंप जेमतेम सुरू आहे. येथील ग्रामस्थांना पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. माथाआंबापाडा, आमलीपाडा, डोसपाडा या पाडय़ांवरील हातपंपही आटल्याने तेथील ग्रामस्थांना अर्धा ते एक किलोमीटर अंतराचा चढ-उताराचा रस्ता पार करून नदी-नाल्यातील ङिा:यांमधून पाणी आणून वापरावे लागत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ब:याच गाव व पाडय़ांर्पयत जाण्यासाठी अद्यापही रस्ते नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठय़ासाठी या पाडय़ांमध्ये पाणी योजना राबविण्यासाठी अडचणी निर्माण होतात. या पाडय़ांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई भासते. यंदा तर पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला. मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे असून काही पाडय़ांवर असलेले हातपंपही आटले आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत या पाडय़ांवर विहिरी खोदल्या तर पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. या पाडय़ांवरील ग्रामस्थांचे दरवर्षी पाण्यासाठी होणारे हाल थांबविण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.