लग्नावरून परतणाऱ्यांवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

By योगेश पांडे | Published: December 16, 2023 09:16 AM2023-12-16T09:16:57+5:302023-12-16T09:17:31+5:30

काटोल तालुक्यातील सोनखांब आणि चारगावमधील शिवाराजवळ ही घटना घडली.

six people died in a collision with a truck | लग्नावरून परतणाऱ्यांवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

लग्नावरून परतणाऱ्यांवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल मार्गावर एक कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला व त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीनंतर काटोल तालुक्यातील सोनखांब आणि चारगावमधील शिवाराजवळ ही घटना घडली.

शुक्रवारी मेंढेपठार गावातील काही लोक एका लग्नाला गेले होते. रात्री क्वालिसमधून नागपूरकडून काटोलच्या दिशेने जात असताना एका भरधाव ट्रकने क्वालिसला धडक दिली. समोरून धडक दिल्याने क्वालिसचा चेंदामेंदा झाला व सहा जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृतक हे एकाच गावातील निवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजय दशरथ चिखले (वय ४५), विठ्ठल दिगंबर घोटे (वय ४५), सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२), रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८), मयूर मोरेश्वर इंगळे (वय ३६), वैभव साहेबराव चिखले (वय ३२) या सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, जगदीश दत्तूजी ढोसे (वय ४०) जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: six people died in a collision with a truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात