Lok Sabha Election 2019; नॉमिनेशनसाठी होणार धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:00 PM2019-03-19T12:00:09+5:302019-03-19T12:11:16+5:30

रामटेक आणि नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

Lok Sabha Election 2019; Run for the nomination | Lok Sabha Election 2019; नॉमिनेशनसाठी होणार धावाधाव

Lok Sabha Election 2019; नॉमिनेशनसाठी होणार धावाधाव

Next
ठळक मुद्देधुलिवंदन व शनिवार-रविवारची सुटी१९, २०, २२ व २५ असे चारच दिवस शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक आणि नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. २५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. परंतु यादरम्यान तीन दिवस शासकीय सुटी असल्याने अर्ज भरण्यासाठी केवळ पाच दिवस मिळत आहेत. तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना धावाधाव करावी लागणार आहे.
राज्यात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघासाठी सोमवारपासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. २१, २३ व २४ मार्चची सुटी आल्याने उमेदवारांना १९, २०, २२ व २५ मार्च असे चारच दिवस मिळणार आहेत. नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख २५ मार्च असून, उमेदवारांच्या अर्जाची छाननी २६ मार्च रोजी करण्यात येईल. २८ मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे.
४अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराने नामनिर्देशनपत्र नमुना २ अ, नमुना २६ (नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्र), शपथेचा किंवा दृढकथनाचा नमुना, छायाचित्राबाबतचे शपथपत्र, स्वाक्षरीचा नमुना आणि मतपत्रिकेतील नावाबाबत पत्र सादर करावयाचे आहे.
या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून उमेदवाराची अपराधिक माहिती, उमेदवारांकडून कायद्याचे झालेले उल्लंघन, दोष सिद्ध ठरवले किंवा नाही याचा तपशील, मागील पाच वर्षांत आयकर विवरण पत्रात दर्शविलेले एकूण उत्पन्न, पॅन क्रमांक, आयकर विवरण पत्र भरल्याची स्थिती, फौजदारी खटले, खटल्याचा तपशील, आदी माहिती सादर करावयाची आहे.
राज्य व देशातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी अर्ज सादर करताना प्रस्तावक (सूचक) म्हणून एक व्यक्ती ग्राह्य धरला जाईल, तर स्वतंत्र (अपक्ष) उमेदवारास १० व्यक्ती प्रस्तावक म्हणून आवश्यक राहतील. तेही ज्या लोकसभा मतदार संघासाठी ते अर्ज करणार आहेत त्याच मतदार संघातील प्रस्तावक असणे गरजेचे असल्याचेही मुदगल यांनी सांगितले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Run for the nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.