संविधान सन्मान यात्रा नागपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 03:11 PM2018-10-12T15:11:48+5:302018-10-12T15:13:11+5:30

देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश मार्गे शुक्रवारी नागपुरात दाखल झाली.

Constitution respect rally enters in Nagpur | संविधान सन्मान यात्रा नागपुरात दाखल

संविधान सन्मान यात्रा नागपुरात दाखल

Next
ठळक मुद्देसंविधानाच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसह व्यवस्था परिवर्तनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होतांना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज असून हे परिवर्तन जनआंदोलनाच्याच माध्यमातून होईल, असा विश्वास जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम् यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश मार्गे शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. या यात्रेदरम्यान शेतकरी, मजूर, कामगारांसह एकूणच नागरिकंच्या समस्या व त्यांच्या संविधानिक अधिकार व शासन ते कसे हिरावून घेत आहे, याबाबत जनजागृती केली जात आहे. गुजरात, मध्यप्रदेश मार्गे ही यात्रा शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. यावेळी यात्रेत सहभगी झालेले मध्य प्रदेशतील किसान संघाचे डॉ. सुनीलम, प्रफुल्ल सामंतारा (भुवनेश्वर), सुनीती सु.र.(पुणे), रत्ना भर्गव, दिपक चौधरी, गुजरात येथील बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाचे कृष्णकांत आणि उत्तराखंड येथे पर्यावरण बचाव आंदोलनातील कार्यकर्ते विमलभाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. सुनीलम् म्हणाले, सध्या संविधान धोक्यात आहे. संविधान वाचवण्याचे कार्य सरकारला करायला हवे परंतु ते करीत नसल्याने आता लोकांनाच संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे लागले, म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे.

सरकार कॉर्पोरेटचे गुलाम
सध्याचे सरकार हे कॉर्पोरेटे गुलाम झाले आहेत.अडाणीड-अंबाणींच्या हितासाठीच विकासाची धोरणे राबवली जात आहेत, त्यामुळे सरकारची विकास नितीच चुकीची आहे. तेव्हा हे सरकार सत्तेतून उखडून फेकणे सर्वात महत्वाचे आहे, असे प्रफुल्ल सामंतारा यांनी सांगितले.

वैमनस्य पसरवणाऱ्यांना सरकारचा छुपा पाठिंबा
सध्या देशात समाजा-समजामध्य, जाती-धर्मामध्ये वैमनस्य पसरवले जात आहे, आणि ते पसरवणाऱ्यांना सरकारचा छपा पाठिंबा आहे, असा आरोप सुनीती यांनी केला.

Web Title: Constitution respect rally enters in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.