आता प्रशासकीय निर्णय झटपट होतात - प्रवीण परदेशी

By Admin | Published: July 11, 2017 06:18 PM2017-07-11T18:18:47+5:302017-07-11T18:26:28+5:30

लोकमत वॉटर समिट 2017 मध्ये सहभागी झालेले राज्याचे मुख्य अपर सचिव प्रवीण परदेशी यांनी प्रशासकीय मान्यतासंबंधीचे निर्णय झटपट होत असल्याचे सांगितले.

Now administrative decisions are instant - Pravin Pardeshi | आता प्रशासकीय निर्णय झटपट होतात - प्रवीण परदेशी

आता प्रशासकीय निर्णय झटपट होतात - प्रवीण परदेशी

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - लोकमत वॉटर समिट 2017 मध्ये सहभागी झालेले राज्याचे मुख्य अपर सचिव प्रवीण परदेशी यांनी प्रशासकीय मान्यतासंबंधीचे निर्णय झटपट होत असल्याचे सांगितले. त्यांना  प्रशासकीय मान्यता प्रलंबित का राहतात? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आता वेगवान निर्णय होत असल्याचे सांगितले. तांत्रिक तपासणी करुन, वित्तीय समितीतून मान्यता घेतली जाते. नस्ती पध्दत आता आम्ही वापरत नाही. वेगवान निर्णय होत आहेत असे त्यांनी सांगितले. 
 
कर्नाटक राज्याला लागून असलेल्या बंद पाईपलाईनमधून शेतीसाठी पाणी सोडणार आहोत असे त्यांनी सांगितले.  जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज लोकमत वॉटर समिट 2017चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन करण्यात आले. 
तर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांची या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती आहे. लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकमतच्या वाचकांचे आभार मानले. 
 
आणखी वाचा 
कर्जमाफी नव्हे कायमचे कर्जमुक्त करायचेय - गिरीश महाजन
शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पूर यांचा जवळचा संबंध - संजीव मेहता
राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण - राजेंद्र सिंह
 
जलदूतांच्या जलकथांना राज्यातील लोकमतच्या वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, जलसंधारणाची राज्याला, मराठवाड्यासारख्या भागांना अतीव गरज आहे. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचे आहे, इस्रायलचे उदाहरण जगाने समोर ठेवावे. जलयुक्त शिवारचे यश महत्त्वाचे, पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणावा. यावेळी बोलताना त्यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या कामाचा गौरवही केला. 
 
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना भारतातील पाण्याची स्थिती आण जलयुक्त शिवाराचे काम का गरजेच आहे याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जगातील पाण्याची उपलब्धता दोन हजार वर्षांपूर्वी जेवढी होती, तेवढीच आजही आहे, पण लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे पाणी नियोजन महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही. लोकमत समूह सामाजिक बांधिलकी जपणारा समूह आहे. 
 
जनसामान्यांचा आवाज म्हणजेच लोकमत असे कौतुक गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी लोकमतचे केले. त्यांनी लोकमतने जलयुक्त शिवाराच्या कामचा घेतलेल्या आढाव्याचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील जलयुक्त शिवारचे कौतुक केले आहे, प्रथमच शेतीचा विचार गांभीर्याने करण्याच आला आहे. जलयुक्त शिवारमुळे राज्यात क्रांती झाली. जलयुक्त शिवार ही लोक चळवळ आहे. जलयुक्त शिवारासाठी लोकांनी भरपूर मदत केली. जनसामान्यांनी जलयुक्त शिवरासाठी 540 कोटी उभे केल्याचे राम शिंदे म्हणाले.
 
 
 
 
 
 
 

Web Title: Now administrative decisions are instant - Pravin Pardeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.