जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला - अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:16 AM2017-11-28T05:16:08+5:302017-11-28T05:17:03+5:30

जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भाजपाने सत्ता मिळविली, मात्र आता जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिडको वाळूज महानगरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केले.

 The government's confidence in the public sparks - Anna Hazare | जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला - अण्णा हजारे

जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला - अण्णा हजारे

googlenewsNext

औरंगाबाद : जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भाजपाने सत्ता मिळविली, मात्र आता जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिडको वाळूज महानगरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केले.
हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले होते; मात्र सत्ता मिळवून साडेतीन वर्षे झाली तरी अद्याप एकाही व्यक्तीच्या खात्यावर १५ रुपये जमा झाले नसल्याचे ते म्हणाले. ‘कुठे गेले तुमचे अच्छे दिन?’ असा सवाल अण्णांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याची खंत हजारे यांनी व्यक्त केली.

Web Title:  The government's confidence in the public sparks - Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.