जळगावात भारनियमनामुळे दालफडमधील उत्पादन निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 10:23 PM2017-09-19T22:23:44+5:302017-09-19T22:28:54+5:30

जोरदार फटका: कामगारांवर बेरोजगाराची वेळ

Half of the production of puls due to loadshading in Jalgaon | जळगावात भारनियमनामुळे दालफडमधील उत्पादन निम्म्यावर

जळगावात भारनियमनामुळे दालफडमधील उत्पादन निम्म्यावर

Next
ठळक मुद्दे40 लाकडी वखारींवरही संकटउलाढाल ठप्पउत्पादन खर्च वाढल्याने आर्थिक भूर्दंड 

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 19 - गेल्या 40 वर्षापासून डाळ तयार करण्यासह कडधान्याला पॉलिश करणा:या जळगावातील दालफड उद्योगाला भारनियमनाचा फटका बसत असून येथील उत्पादन निम्म्यावर आले आहे. इतकेच नव्हे 200हून अधिक कामगारांवर हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. या सोबतच 40 लाकडाच्या वखारींनादेखील याची झळ पोहचत आहे. 
शहरातील शिवाजीनगरमध्ये नवीन हुडको भाग, भुरे मामलेदार प्लॉट या भागांमध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून दालफड सुरू आहे. दालफड व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांमार्फत चालविण्या:या या उद्योगामध्ये डाळ तयार करण्यासह मठ, उडीद, मूग यांना पॉलिश करण्याचे काम केले जाते. मात्र गेल्या दोन अडीच महिन्यांपासून या उद्योगाला वेगळ्य़ावेगळ्य़ा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  

9 तास भारनियमनामुळे फटका
1 जुलै पासून लागू झालेल्या वस्तू व सेवा करामुळे  (जीएसटी) दालफड व्यापारी हैराण झाले. त्यानंतर यातून कसेबसे सावरत नाही तोच आता गेल्या 10 दिवसांपासून  या उद्योगाला भारनियमनाचा फटका बसत आहे. शिवाजीनगर येथे दररोज सकाळी साडेचार तास व दुपारी अथवा संध्याकाळी साडेचार तास भारनियमन केले जात आहे. दिवसभरातील नऊ तासाच्या भारनियमनामुळे हा उद्योग कोलमडला असून व्यापारी चिंतातूर झाले आहेत. 
 
पॉलिश होईना
दालफडमध्ये दररोज 50टन डाळीचे उत्पादन केले जाते. मात्र सध्या मालाची आवक नसल्याने तसेच पावसाळी वातावरणामुळे डाळ वाळत नाही म्हणून येथे डाळीचे उत्पादन नसते. पॉलिशचे काम या दिवसात केले जाते. त्यानुसार दररोज 100 टन मालाला पॉलिश केली जाते. मात्र भारनियमनामुळे हे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाले आहे. सध्या 50 टनमालदेखील तयार होत नसल्याचे येथील व्यापा:यांनी सांगितले. 

दालमिलमध्ये जवळपास 200 कामगार आहे. मात्र भारनियमनामुळे उत्पादन बंद असले तरी उद्योजकांना मजुरी मोजावीच लागत आहे आणि मालाचे उत्पादन मात्र कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे  वस्तूंवरील उत्पादन खर्च वाढला आहे तर दुसरीकडे पाहिजे तसा भाव मालाला मिळत नाही. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. 

दालफडमधून शहरातील व्यापारी केंद्र असलेल्या दाणाबाजारात दररोज डाळी व इतर धान्याची दररोज मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. मात्र भारनियमनामुळे शार्टेक्स मशिनदेखील चालविता येत नसल्याने उलाढाल जवळपास ठप्प झाली आहे. 
    
दालफडसोबतच या भागातील लाकूडपेठ, शिवाजीनगर येथे 40 लाकडी वखारी आहेत. त्यांनाही या भारनियमनाचा फटका बसून तेथील उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

बेरोजगारी वाढण्याची भीती
वर्षभर चालणा:या दालफड व लाकडी वखारी येथे सध्या भारनियमनामुळे काम होत नसल्याने कामगार हातावर हात धरून बसले आहेत. त्यामुळे दालफडमधील 200 तर वखारींमधील 175 कामगारांनादेखील झळ बसू शकते. त्यामुळे 375 कामगारांवर बेरोजगारीचे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात केवळ शनिवारी भारनियमन केले जाते. त्याच धर्तीवर शिवाजीनगर भागात वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी दालफड व्यापारी असोसिएशनच्यावतीने वीज वितरण कंपनीकडे केली आहे. 

आधीच जीएसटीमुळे उद्योजक हैराण असून आता भारनियमनामुळे मोठा फटका बसत आहे. उत्पादन निम्म्यावर आले असून येथे आठवडय़ातून एकच दिवस भारनियमन करण्यात यावे अथवा त्याचे प्रमाण कमी करण्यात यावे. 
- गोपाल व्यास, अध्यक्ष, दालफड व्यापारी असोसिएशन, जळगाव. 

Web Title: Half of the production of puls due to loadshading in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.