खान्देशातून दररोज १५० ट्रक कापूस गुजरातकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 06:23 PM2017-11-14T18:23:21+5:302017-11-14T18:25:26+5:30

कापसाला रास्त भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच गुजरात शासनाने कापसावर५०० रुपयाचा बोनस जाहीर केल्यामुळे खान्देशातून दररोज सुमारे १५० ट्रक कापूस गुजरातकडे रवानाहोतआहेत. मात्र यामुळे शेतकºयांना कवडीमात्र फायदा होत असून, व्यापारीच ‘गब्बर’ होत असल्याचे चित्र आहे.

Gujarat casts 150 trucks every day from fisheries | खान्देशातून दररोज १५० ट्रक कापूस गुजरातकडे

खान्देशातून दररोज १५० ट्रक कापूस गुजरातकडे

Next
ठळक मुद्दे कापसावर बोनस दिल्याने शेतकºयांचा कल गुजरातकडे व्यापारीच होताहेत ‘गब्बर’ खासगीत ३ लाख गाठींची खरेदी तर ‘पणन’मध्ये ठणठणाट

आॅनलाईन लोकमत

अजय पाटील

जळगाव,दि.१४-कापसाला रास्त भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच गुजरात शासनाने कापसावर५०० रुपयाचा बोनस जाहीर केल्यामुळे  खान्देशातून दररोज सुमारे १५० ट्रक कापूस गुजरातकडे रवानाहोतआहेत. मात्र यामुळे शेतकºयांना कवडीमात्र फायदा होत  असून,  व्यापारीच ‘गब्बर’ होत असल्याचे चित्र आहे.

खान्देशात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. यंदादेखील खान्देशात सुमारे ६ लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासूनचा कापसाचा बाजार यंदा तेजी येण्याची शक्यता होती. त्यामुळे हमीभावचे दर देखील वाढण्याची अपेक्षा होती. मात्र सर्व अपेक्षा फोल ठरल्या असून, यंदाही कापूस उत्पादक शेतकºयांना फटका बसला आहे.

‘जीएसटी’वर परिणाम
शेतकºयांना यंदा कापूसच्या बोनसची शक्यता फारच कमी आहे. गुजरात सरकारकडून कापसाला बºयापैकी दर आहे. त्यामुळे खान्देशातून आतापर्यंत १५ हजारकापसाचेट्रक  गुजरातला रवानाझालेआहेत. त्याचा थेट परिणाम जीएसटीवर देखील होत असून, शेतकºयांकडून व्यापाºयांना माल विक्री करताना कुठलाही कर लागत नाही.

महाराष्टत बोनस का नाही?
गुजरात सरकारने प्रतिक्ंिवटल ५०० रूपये बोनस जाहीर करून तेथील कापूस उत्पादक शेतकºयांना खूश करण्याचा प्रयत्न केला.त्या ठिकाणचा हमीदर महाराष्टÑाइतकाच  प्रतिक्ंिवटल ४ हजार ३२० रुपये इतकाच आहे. मात्र  बोनस ५०० रूपये मिळतअसल्याने ४ हजार ८२० रूपये भावशेतकºयांना मिळत आहेत. राज्यात मात्र हमीदर कमी असताना शेतकºयांकडून प्रतवारीचे निकष लावले जावून मालाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्त व्यापाºयांना कापूस विक्रीकरावा लागत आहे. त्यामुळे राज्यशासनाने देखील कापसावर बोनस जाहीर करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

लोकप्रतिनीधींची चुप्पी
राज्यातील कापूस गुजरातकडे जात असताना, लोकप्रतिनीधी मात्र याबाबत  एक शब्दही बोलायला तयार नाहीत. कापसाच्या हमीभावासाठी आंदोलन करणारे तत्कालीन आमदार व विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजनहीयाबाबतबोलायलातयारनाही.

 खासगीत ३ लाख गाठींची खरेदी तर ‘पणन’मध्ये ठणठणाट
१. खान्देशातील खासगी जिनींगमध्ये आतापर्यंत ३ लाख गाठींची खरेदी झाली असून, खासगी जिनींगमध्ये शेतकºयांना प्रतीक्विंटल४,४०० ते ४,५०० पर्यंत दर दिला जात आहे.
२. शासनाच्या पणन महासंघाच्या कापूस  खरेदी केंद्रावर एकाही शेतकºयानेअद्याप कापूस विक्री केलेला नाही. सीसीआयच्या १३ केंद्रावर देखील पणन महासंघासारखीच स्थिती आहे.
३. शेतकºयांकडून हा माल थेट गुजरातमध्ये जात नसून, खान्देशातील शेतकरी स्थानिक व्यापाºयांना आपला माल विक्री करतात व व्यापाºयांकडून हा माल गुजरातमध्ये विक्री केला जात असल्याने व्यापारीच ‘गब्बर’ होत असल्याचे चित्र आहे.

कोट..
गुजरात सरकारने बोनस दिल्याने शेतकºयांचा कल गुजरातकडे अधिक आहे. दिवसभरात दीडशे ट्रक भरुन कापूस गुजरातकडे जात आहेत. बोनस जाहीर न झाल्यास शेतकºयांकडून हे पाऊल उचलले जात आहे.
-प्रदिप जैन, अध्यक्ष खान्देश जिनींग असोसिएशन

राज्यशासनाने कापसावर बोनस जाहीर करण्याची गरज आहे. शेतकरी आत्महत्याकरीत असताना स्थानिक लोकप्रतिनीधी देखील काहीही बोलायला तयार नाही.
-संजय पवार, संचालक,पणन महासंघ

Web Title: Gujarat casts 150 trucks every day from fisheries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.