‘सहज बिजली’ला ३५ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:01 AM2018-05-23T01:01:07+5:302018-05-23T01:01:07+5:30

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर या योजनेचे (सौभाग्य) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एपीएलच्या ४८ हजार २४९ तर बीपीएलच्या २७८0 कुटुंबांकडे वीज नसल्याचे आढळून आले आहे.

 'Easy electricity' needs to be 35 crores | ‘सहज बिजली’ला ३५ कोटींची गरज

‘सहज बिजली’ला ३५ कोटींची गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रधानमंत्री सहज बिजली हर घर या योजनेचे (सौभाग्य) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एपीएलच्या ४८ हजार २४९ तर बीपीएलच्या २७८0 कुटुंबांकडे वीज नसल्याचे आढळून आले आहे. यासाठी ३५ कोटी लागणार असून सर्वांना आॅक्टोबरपर्यंत वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ज्या गोरगरीब कुटुंबांकडे वीज जोडणी नाही, अशांना सवलतीच्या दरात ही जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना जाहीर केली होती. मागील महिन्यात या योजनेसाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या योजनेत आता एकूण एपीएलच्या ४८ हजार २४९ लाभार्थ्यांना जोडणी द्यावी लागणार असल्याचे अंतिमरीत्या समोर आले.
ही सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ११ केव्ही वीजवाहिनी १00 किमीची टाकावी लागणार आहे. तर लघुदाब वीजवाहिनीची ३५0 किमी लांबीच्या कामाची गरज पडणार आहे. याशिवाय जिल्ह्यात ३३४ नवीन डीपींची गरज भासणार आहे. याशिवाय हिंगोली शहरासाठी १४ किमी लघुदाब वाहिनी, ४ डीपींची गरज पडणार आहे. तर आॅक्टोबरपर्यंत ही कामे करण्यासाठी महावितरणला ३५ कोटी रुपयांची गरज भासणार आहे.
या योजनेत आधी ९१ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. एपीएलचे तब्बल ५१ हजार तर दारिद्र्य रेषेखालील १७ हजार लाभार्थी असतील, असे अपेक्षित धरले होते. मात्र प्रत्यक्ष पडताळणीत एपीएलची संख्या त्या जवळपास असली तरीही बीपीएलची मात्र अवघी २८00 एवढीच संख्या निघाली.
या योजनेच्या सर्वेक्षणात एपीएलचे औंढ्यात ८0१0, वसमतला १0९0५, हिंगोलीत १0४७२, कळमनुरीत ८८५७ तर सेनगावात १000५ एवढे पात्र लाभार्थी आहेत. यांना पाचशे रुपयांत जोडणी मिळेल तर ही रक्कम त्यांना प्रतिमहिना ५0 रुपये याप्रमाणे देयकातच आकारली जाईल.
बीपीएलचे औंढा-११३२, वसमत-४९, हिंगोली-0, कळमनुरी-७२0, सेनगाव-६0८ अशी संख्या या योजनेतील आहे. तर याशिवाय १0३00 बीपीएल लाभार्थ्यांना दीनदयाल उपाध्याय योजनेत लाभ मिळणार आहे. त्यात न मिळाल्यास त्यांना याचा लाभ मिळू शकतो.
ही कामे करण्यासाठी शासनाने निधीची तरतूद केलेली आहे. जशी निधीची उपलब्धता होईल. तशी ही कामे केली जाणार आहेत. लवकरच ही कामे सुरू होतील, असे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी म्हणाले.

Web Title:  'Easy electricity' needs to be 35 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.