कंवर समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:15 AM2017-11-22T00:15:48+5:302017-11-22T00:16:02+5:30

महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कंवर समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने स्थानिक किसान मंगल कार्यालयात दोन दिवसीय एकता प्रबोधन मेळावा घेण्यात आला.

Discussion on various issues of Kanwar society | कंवर समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा

कंवर समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा

Next
ठळक मुद्देकुरखेडा येथे एकता प्रबोधन मेळावा : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : महाराष्ट्र  प्रदेश आदिवासी कंवर समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने स्थानिक किसान मंगल कार्यालयात दोन दिवसीय एकता प्रबोधन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. मेळाव्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन कुरखेडा पंचायत समितीचे सभापती गिरीधारी तितराम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कंवर समाजाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराज कपूर होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक भरतसिंग दुधनाग, केंद्रप्रमुख विजय बन्सोड, गणेश फुलकवर, कुरखेडा नगर पंचायतीच्या उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, हरीशचंद्र पेंकरा, अनिल केरामी, पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी, पीएसआय शिवप्रसाद कराडे, सुनेर सोनटापर, भिकम फुलकवर, अंबिका बंजार, जितेंद्र चंद्रबंशी, धर्मदास उईके, कुमारीबाई जमकातन, लघुन कार्यपाल, माजी सभापती अवधराम बागमुळ, रेखा ब्रह्मणायक, विनोद मडकाम, गिरीधर मेश्राम, प्रगुलास शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. मेघराज कपूर यांनी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्मचारी बांधवांनी एकत्र येऊन समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सध्याची शैक्षणिक स्थिती, बेरोजगारी, शासन सुविधा, शेतकºयांसमोरील आव्हाने यावर प्रकाश टाकला. जवळपास ५ हजार बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर गैरआदिवासींनी नोकºया बळकावल्या आहेत. मूळ आदिवासी मात्र आपल्या अस्तित्वासाठी धडपड करीत आहे. खºया आदिवासींना जाचक अटी लादून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपले स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवायचे असेल तर सांस्कृतिक ठेवा जोपासण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी सभापती गिरीधारी तितराम, भरतसिंग दुधनाग, प्रभाकर तुलावी, जयश्री धाबेकर, विजय बन्सोड, कुमारीबाई जमकातन यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा. गणेश सोनकलंगी, गुलाब सोनकुकरा, नीलकंठ बख्खर, परमानंद पुजेरी, संतराम धिकोंडी, सोनुराम कपूर, गणेश सोनवानी, महानू हुंडरा, हेमराज कुवर, चेतानंद जमकातन, मदन बागडेरिया, राधेश्याम फुलकुवर, अनिता चावर, धनंजय कुवर यांनी सहकार्य केले. या मेळाव्याला जिल्हाभरातील हजारो कंवर समाजाचे नागरिक, महिला व विद्यार्थी, युवक उपस्थित होते.
गौरा-गौरी कलशयात्रा
मेळाव्यानिमित्त कुरखेडा येथून पारंपरिक वेशभुषेतील कंवर समाजाच्या महिलांनी गौरा-गौरी कलशयात्रा काढली. रेला नृत्य, मंडई यांची रॅली काढण्यात आली. राष्टÑपती पोलीस पदत विजेता गजेंद्र सोंनजाल, संगीता जमकातन यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.

Web Title: Discussion on various issues of Kanwar society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.