बुलडाणा जिल्ह्यात आठ मंडळामध्ये अतिवृष्टी; शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 02:14 PM2019-06-28T14:14:11+5:302019-06-28T14:14:19+5:30

बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.

Havy rain in Buldhana district's eight mandals | बुलडाणा जिल्ह्यात आठ मंडळामध्ये अतिवृष्टी; शेतीचे नुकसान

बुलडाणा जिल्ह्यात आठ मंडळामध्ये अतिवृष्टी; शेतीचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पहिल्यांदाच सार्वत्रिक स्वरुपाचा झालेला पाऊस खरीप हंगामाच्या दृष्टीने पोषक ठरणारा आहे. दरम्यान, जिल्ह्यात ९० मंडळांपैकी आठ मंडळ आणि खामगाव शहरात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.
बुधवारी रात्री जिल्ह्यात या सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाची संततधार सुरू होती. गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा बुलडाणा तालुक्यात ६१ मिमी तर शेगाव तालुक्यात ५२.२ मिमी पडला. , म्हसला बुद्रूक, धाड, देऊळघाट, साखळी बुद्रूक, डोणगाव, अमडापूर, धोडप, टिटवी या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. यंदाच्या पडलेल्या पावसाची त्याच्याशी तुलना करता वार्षिक सरासरीच्या ११.५१ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या सरासरीशी तुलना करता ती ५४.३१ टक्के आहे. दरम्यान पडलेल्या या सार्वत्रिक स्वरुपाच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यात सर्वत्र पेरण्यांनी वेग घेतला आहे. जवळपास २० दिवस उशिराने का होईना हा पाऊस आला असून एक प्रकारे खरीप हंगामातील पेरणीमध्ये या पावसाने जान आणली आहे. परिणामी कृषी विभागास किमान पक्षी आता आपतकालीन नियोजन करण्याची तुर्तास तरी गरज भासणार नसल्याचे चित्र या पावसामुळे निर्माण झाले आहे. दरम्यान असे असले तरी देऊळगाव राजा तालुक्यात अद्याप अपेक्षीत असा पाऊस पडलेला नाही. या तालुक्यात जून महिन्याच्या सरासरीचा विचार करता अवघा १८.७९ टक्केच पाऊस पडला आहे.


अतिवृष्टीमुळे तांदुळवाडी, कोलवडमध्ये नुकसान
देऊळघाट सर्कलमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेत जमीन खरडून गेली आहे. सोबतच गावा लगतच्या ६० ते ७० घरामध्ये पुराचे पाणी घुसून ग्रामस्थांचे गृहोपयोगी साहित्य पुरात वाहून गेले. त्यामुळे गावातील जवळपास २५ कुटुंबांच्या घरात गुरूवारी चुल पेटू शकली नाही. पुरामुळे प्रकाश रिंढे व अन्य एका व्यक्तीचे सुमारे साडेतीनशे पक्षी मृत पावले असून चार बकºयाही दगावल्या आहेत. या व्यतिरिक्त शेतीचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठच्या शेतात दगडांचा खच निर्माण झाला आहे. तांदुळवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या जवळपास २६ ते २७ विहीरी खचल्या असून शेतकºयांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. अशीच काहीशी परिस्थिती ही कोलवड परिसरातही झाली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या प्रकरणी तहसिलदारांनी नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांना दिले आहे.
टिटवी मंडळात सर्वाधिक पाऊस
४जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून यामध्ये लोणार तालुक्यातील टिटवी मंडळात तब्बल १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अमडापूर मंडळात १०० मिमी, साखळी बुद्रूक मध्ये ८६, धाड मंडळात ८१ मिमी, डोणगावमध्ये ७८, म्हसला बुद्रूकमध्ये ७१, देऊळघाटमध्ये ७३, धोडपमध्ये ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ््यातील ही पहिलीच अतिवृष्टी आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.
दोन जण वाहून गेल्याची अफवा
 पैनगंगा नदीला बुधवारी मध्यरात्री आलेल्या पुरात दोन जण वाहून गेल्याची अफवा दिवसभर होती. मात्र तथ्य तपासले असता ती अफवाच असलेल्या बुलडाणा तहसिलमधील आपत्ती विभागाशी सबंधित लिपीकाने स्पष्ट केले. मात्र पुराच्या पाण्यात एक चार चाकी वाहन वाहून जाता जाता बचावले. या वाहनातील नागरिक सुरक्षीतपणे बाहेर पडले होते. मात्र ते कोण होते याची माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Havy rain in Buldhana district's eight mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.