आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:03 PM2018-06-24T22:03:33+5:302018-06-24T22:04:19+5:30

शहराच्या मध्यभागी आठवड्यातून दोन दिवस भरत असलेल्या आठवडी बाजारातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी व्यावसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत.

Cleanliness of the Week in the Market | आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे

आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे

Next
ठळक मुद्देउपेक्षा कायम : वर्षाकाठी मिळतोय लक्षावधींचा महसूल

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराच्या मध्यभागी आठवड्यातून दोन दिवस भरत असलेल्या आठवडी बाजारातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी व्यावसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. उघड्यावर फेकलेला सडलेला भाजीपाला, ओट्यांची दुरवस्था, अतिक्रमण हीच खरी या बाजाराची ओळख ठरली आहे. प्रशासन मात्र प्रस्तावाच्या मंजुरीवर लक्ष केंद्रित करून आहे.
जिल्ह्याचीे लोकसंख्या १५ लाखांच्या वर पोहोचली आहे. यात भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे. दर आठवड्यातून दोन वेळा आठवडी बाजार भरतो. रविवारी मोठा तर बुधवारी मिनी बाजार भरतो. रविवारपेक्षा बुधवारी भाजी विक्रेत्यांची संख्या कमी असते. या बाजारारत टाकळी, पांढराबोडी, गणेशपूर, कारधा, भिलेवाडा, पलाडी, करचखेडा, सुरेवाडा, माडगी, सातोना, मोहदुरा, खोकरला, टेकपार, भोजापूर आदी गावातील लहान-मोठे भाजीविक्रेते येत असतात. लोकसंख्येच्या मानाने शहराच्या विविध ठिकाणीही बाजार भरतो. यात महात्मा गांधी चौक, बीटीबी मार्केट मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक मार्ग, खात रोड मार्ग आदी ठिकाणचा समावेश आहे. प्रविवारी व बुधवारी भरणाऱ्या बाजाराची शान आजही कमी झालेली नाही. मात्र सुविधांअभावी या बाजाराला अजुनही उठाव आलेला नाही.
हजारो नागरिक येथे बाजारासाठी येत असले तरी विकासाअभावी त्यांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेचे स्वच्छता कर्मचारी अहोरात्र राबतात, पण अस्वच्छता करणाऱ्यांची कमी नाही. याला सर्वस्वी जबाबदार नगर पालिक प्रशासन आहे, असेही म्हणता येणार नाही. याला नागरिकांसह भाजीविक्रेत्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारीही तेवढीच महत्वाची आहे. योजनेची अंमलबजावणी केव्हा होणार? हाच खरा प्रश्न आहे. दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती व पालिका प्रशासन यामध्ये बाजार ओटा संदर्भात न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. परिणामी बाजार विकासासाठी निर्णय होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
अशा आहेत प्रमुख समस्या
आठवडी बाजार ओसरल्यानंतर सडलेला भाजीपाला साहित्य तिथेच फेकून दिला जातो. कर देतोय तर सुविधा का मिळत नाही, असा थेट सवाल भाजीविक्रेत्यांचा आहे. आठवडी बाजाराचा कंत्राट कुणालाही असो मात्र लिलावातून मिळणारी रक्कम थेथ पालिका प्रशासनालाच मिळते. सडक्या भाजीपाल्यांवर यथेच्छ ताव मारणारे मोकाट जनावरे, अतिक्रमण निर्मूलनानंतर वाईट स्थितीत आलेले बाजारओटे, २४ तास येणारी दुर्गंधी, पाण्याची टंचाई, नाल्यांचे सदोष बांधकाम, साचलेला कचरा या बाजाराच्या प्रमुख समस्या आहेत.

बाजाराच्या विकासासंदर्भात पालिका प्रयत्नशिल आहे. सर्वप्रथम मटण बाजारासाठी जवळपास ५० लक्ष रूपयांचा प्रस्ताव सादर केलेला आहे.
-नितीन धकाते, सभापती,
स्वच्छता समिती, नगर परिषद भंडारा

Web Title: Cleanliness of the Week in the Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.