माजलगावात उसतोड बंद आंदोलन सुरु; उसाला वाढीव भाव मिळवण्यासाठी सर्वपक्षीय निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 03:59 PM2017-12-05T15:59:15+5:302017-12-05T17:07:12+5:30

उसाला योग्य भाव द्या या मागणीसाठी गत एक ते दीड महिन्यापासून विविध आंदोलन सुरु आहेत. मात्र, या आंदोलनाला साखर कारखानदार कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने आता थेट फडात जाऊन उसतोडणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेतला. 

Inmajalgaon closing movement started; All-party decision to get increased prices of sugarcane | माजलगावात उसतोड बंद आंदोलन सुरु; उसाला वाढीव भाव मिळवण्यासाठी सर्वपक्षीय निर्णय 

माजलगावात उसतोड बंद आंदोलन सुरु; उसाला वाढीव भाव मिळवण्यासाठी सर्वपक्षीय निर्णय 

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यातील उसउत्पादक शेतकरी  मागील दीड महिन्यापासून विविध आंदोलने करत आहेत उसाला 2 हजार 600 रुपयांप्रमाणे पहिली उचल देवून 3 हजार 500 रुपये भाव देण्यात यावा अशी शेतक-यांची मागणी आहे

माजलगांव ( बीड ) :  उसाला योग्य भाव द्या या मागणीसाठी गत एक ते दीड महिन्यापासून विविध आंदोलन सुरु आहेत. मात्र, या आंदोलनाला साखर कारखानदार कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने आता थेट फडात जाऊन उसतोडणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेतला. 

तालुक्यातील उसउत्पादक शेतकरी  मागील दीड महिन्यापासून विविध आंदोलने करीत उसाला 2 हजार 600 रुपयांप्रमाणे पहिली उचल देवून 3 हजार 500 रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी करीत आहेत. मात्र या मागणीला कारखानदार कसलाच प्रतिसाद देत नाहीत. दरम्यानच्या काळात प्रशासनाने दखल घेवून बैठकीतुन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला मात्र कारखानदार हे 2 हजार रुपयांच्या वर भाव द्यायला कांहीकेल्या तयार नाहीत त्यामुळे हा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकरी  आणि कारखानदार यांच्यातील भावा संदर्भात वादामुळे मागील अनेक दिवसांपासून प्रत्येकवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वारंवार मागणी करुन देखील प्रशासन अथवा कारखानदार दखल घेत नाहीत असे पाहुन आता उसउत्पादक शेतक-यांनी उसतोड बंदी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेवून तो लगेचच अंमलात आणण्याचे जाहिर केले. त्यामुळे आगामी काळात उसा अभावी कारखान्यांची गोची होणार हे मात्र नक्की आहे. 

बाजार समिती आवारात बोलावण्यात आलेल्या या बैठकीत भाई गंगाभिषण थावरे, नितीन नाईकनवरे, धम्मानंद साळवे, नारायण गोले, डाॅ. उध्दव नाईकनवरे, बबनराव सोळंके, हनुमान कदम, नारायण होके, राजेंद्र होके, नाना घाटुळ, पापा सोळंके, नुमान चाउस, राजाभाउ शेजुळ, विकास कदम, रामचंद्र डोईजड यांच्यासह विविध सामाजिक राजकिय पदाधिकारी तसेच उसउत्पादक शेतक-यांचा मोठया प्रमाणावर सहभाग होता. 

शुक्रवारी आमदारांच्या घरावर मोर्चा 
आमदार आर. टी. देशमुख यांनी साखर आयुक्तांकडून उस उत्पादक शेतक-यांना भाव मिळवुन द्यावा या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ८) त्यांच्या घरावर शेतकरी संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे भाई थावरे यांनी यावेळी सांगितले.  

Web Title: Inmajalgaon closing movement started; All-party decision to get increased prices of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.