शहरात नागरी समस्यांचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:46 AM2017-11-20T00:46:32+5:302017-11-20T00:46:35+5:30
शहरातील १५ लाख नागरिकांना रस्ते, पाणी, पथदिवे, ड्रेनेज यंत्रणा आदी सोयीसुविधा देण्याचे दायित्व आपल्या महापालिकेवर आहे. मागील काही वर्षांमध्ये महापालिका आपल्या दायित्वापासून लांब जात आहे की, काय...? अशी शंका उपस्थित होत आहे.
औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना रस्ते, पाणी, पथदिवे, ड्रेनेज यंत्रणा आदी सोयीसुविधा देण्याचे दायित्व आपल्या महापालिकेवर आहे. मागील काही वर्षांमध्ये महापालिका आपल्या दायित्वापासून लांब जात आहे की, काय...? अशी शंका उपस्थित होत आहे. वर्षानुवर्षे नागरिकांच्या समस्या आहे तिथेच आहेत. या समस्या मार्गीच लागत नाहीत. ‘लोकमत’ने ‘पाठवा तुमच्या समस्या’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना व्हॉटस् अॅपवरून आपल्या समस्या पाठविण्याचे आवाहन केले होते. याला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.