वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ५८ टक्क्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:59 PM2018-08-24T12:59:34+5:302018-08-24T13:04:47+5:30

 Varhada reservoirs reached 58% | वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ५८ टक्क्यांवर 

वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ५८ टक्क्यांवर 

Next
ठळक मुद्देअकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत.या सर्व धरणात २४ आॅगस्ट रोजी ५८.०२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यातील धरणातील साठा आजमितीस ५०.०२ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा मात्र ८० टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकरांसह शेतकºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणात २४ आॅगस्ट रोजी ५८.०२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ८० टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९५.५३ टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ४५.३७ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ८७.०४ टक्के जलसाठा संकलित झाल्याने या धरणाचे दोन वक्रव्दारातून शुक्रवारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ६.२८ टक्के आहे. तोरणा १४.०७, तर उतावळी धरणातील पातळी ३०.२२ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.८६ टक्के, पेनटाकळी धरणात १३.८२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.३६ टक्के, पलढगमध्ये २३.८३ टक्के, मन धरणात २२.०५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८७.३३ टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे.
अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४६.८८ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ९८.९७, तर बेंबळा धरणात ५९.७६ टक्केच जलसाठा आहे.
- पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्यातील धरणात यावर्षी बºयापैकी जलसाठा संचयित झाला असून, यावर्षी शेतकºयांना रब्बी व उन्हाळी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येईल. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठरल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
अंकुर देसाई,
अधीक्षक अभियंता,
पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

Web Title:  Varhada reservoirs reached 58%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.