जुन्या वैमनस्यातून शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 06:09 PM2018-10-23T18:09:23+5:302018-10-23T18:13:04+5:30

निंबा फाटा (अकोला) : जुन्या वैमनस्यातून शेतकऱ्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी डोंगरगाव शेतशिवारात घडली.

 The farmer murder at village in akola | जुन्या वैमनस्यातून शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या

जुन्या वैमनस्यातून शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या

Next
ठळक मुद्देदयाराम तुळशीराम सुलताने (५०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. आरोपी संतोष रामचंद्र पांडे व सुनील संतोष पांडे या बाप-लेकास अटक केली आहे.

निंबा फाटा (अकोला) : जुन्या वैमनस्यातून शेतकऱ्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी डोंगरगाव शेतशिवारात घडली. दयाराम तुळशीराम सुलताने (५०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी उरळ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी संतोष रामचंद्र पांडे व सुनील संतोष पांडे या बाप-लेकास अटक केली आहे.
डोंगरगाव येथील दयाराम सुलताने हे २२ आॅक्टोबर रोजी आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्रभर ते घरी परतले नसल्याने सुलताने यांचा मुलगा आणि भाऊ त्यांना शोधण्यासाठी २३ आॅक्टोबर रोजी शेतात गेले. शोध घेत असताना त्यांना बाजूलाच असलेल्या ठाकरे यांच्या विहिरीत दयाराम सुलताने पडलेले आढळले. त्यांना बाहेर काढले असता त्यांच्या अंगावर कुऱ्हाड आणि धारदार शस्त्राने वार केलेले आढळले. त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झालेला होता. याप्रकरणी उरळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास करून संतोष रामचंद्र पांडे आणि सुनील संतोष पांडे यांना अटक केली. पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत.

 

Web Title:  The farmer murder at village in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.