जलजागृतीसाठी चालले अकोलेकर; ‘वॉटर रन’ला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:33 PM2018-03-19T17:33:58+5:302018-03-19T17:33:58+5:30

अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातुन एका भव्य ‘वॉटर रन’चे आयोजन करण्यात आले. या ‘वॉटर रन’चा शुभारंभ पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन केला.

Akolekar running for awareness; Response to 'Water Run' | जलजागृतीसाठी चालले अकोलेकर; ‘वॉटर रन’ला प्रतिसाद

जलजागृतीसाठी चालले अकोलेकर; ‘वॉटर रन’ला प्रतिसाद

Next
ठळक मुद्देया ‘वॉटर रन’चा शुभारंभ पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन केला.अशोक वाटीका मार्गे निघून अधिक्षक अभियंता अकोला पाटबंधारे मंडळ येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. पाणी वाचवा देश वाचवा’ या सारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

अकोला: राज्यात १६ ते २२ मार्च २०१८ दरम्यान जलसंपदा व पाटबंधारे विभागामार्फत पाणी बचतीचे महत्व पटविण्यासाठी जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्य रविवार, १८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातुन एका भव्य ‘वॉटर रन’चे आयोजन करण्यात आले. या ‘वॉटर रन’चा शुभारंभ पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे, अकोला पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वॉटररनची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून झाली. अशोक वाटीका- नविन बस स्थानक- टॉवर चौक ते पुन्हा नवीन बस स्थानक -अशोक वाटीका मार्गे निघून अधिक्षक अभियंता अकोला पाटबंधारे मंडळ येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या वॉटररनच्या पुढे जलजागृतीचे संदेश देणारे फलक शेकडोंच्या हातात होते . ‘जल है, तो कल है’, ‘पाण्याची बचत काळाची गरज’ , ‘पाणी वाचवा देश वाचवा’ या सारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपुर्ण शहर जलजागृती साठी सज्ज झाल्याचे दिसुन येत होते.
पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब अडवून जमीनीत मुरविने आवश्यक आहे. भवीष्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे यासाठी जलजागृती करणे जलसंर्वधन करणे तसेच असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी जल शपथ’ घेण्यात आली. पाण्याच्या योग्यवापर विषयक जनजागृती एक लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई व व सुत्र संचालन अरविंद भोंडे यांनी केले.
या वॉटररनमध्ये पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन तसेच विविध विभागाचे अधिकारी/ कर्मचारी नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

 

Web Title: Akolekar running for awareness; Response to 'Water Run'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.