पा ण्या चा पु न र्वा प र; ब च ती ची आ व श्य क ता
By admin | Published: July 14, 2014 10:59 PM2014-07-14T22:59:28+5:302014-07-15T00:47:08+5:30
अहमदनगर : एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या नगरवर एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची नामुष्की ओढवणार आहे. मुळा धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
अहमदनगर : एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या नगरवर एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची नामुष्की ओढवणार आहे. मुळा धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय आता सोडण्याची गरज आहे. नगरमधील काही सोसायट्या,नागरिकांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे, यातून नागरिकांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी
पुढे येण्याची हीच वेळ आहे.
काही सोसायट्यांनी पाण्याच्या पुनर्वापराचे प्रकल्प उभारले आहेत. सांडपाण्याचा यातून पुरेपूर वापर होत आहे, यामुळे पाणीपट्टीत सवलत तर मिळणार आहेच, त्याचबरोबर पाण्याची बचतही होणार आहे. पाऊस आला नाही तर पाणी कपातीची आपत्ती ओढवणार आहे. त्यावेळी पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरू झाला, की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे. नगर वाढतंय, लोकसंख्या वाढतीय. मात्र, नगरसाठीची पाणीसाठवण क्षमता मात्र वाढणार नाही. उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे, त्यामुळे आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. महापालिकेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणीबचतीसाठी काळजी घ्यायला हवी.
नगरकरांनो लक्षात ठेवा...
खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे़ त्यात पावसाने ओढ दिल्याने नगरकरांवर आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे़ आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत़ या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो़
सामूहिक जबाबदारी
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करा
येत्या पावसाळ््यात छतावर पडणाऱ्या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्या
जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे.
नैसर्गिक जलस्रोत व टेकड्यांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून पुन्हा ‘ग्रीन सिटी’ ही ओळख निर्माण करावी.
वैयक्तिक जबाबदारी
नागरिकांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा.
आंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढचे पाणी घ्यावे.
नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी.
उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करावा.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण विश्वस्त असल्याचे भान ठेवून काही व्यक्ती, संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांनी यापूर्वीपासूनच पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण व पुनर्वापरासाठीचे प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या कामातून अनेकांना प्रेरणा मिळेल. ‘लोकमत’च्या माध्यमातून त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्याला बळ देण्याचा आमचा मानस आहे.
आपल्या उपक्रमाची/प्रयोगाची माहिती ‘लोकमत’ कार्यालयात पाठवा. पत्ता : लोकमत भवन, पत्रकार चौक, नगर-मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. फोन (०२४१) २४२९९०२,२४२९७११
(ई-मेल : ल्ल्लंँ१’ङ्म‘ें३@ॅें्र’.ूङ्मे) - संपादक
आपत्कालीन परिस्थितीत पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग व जुन्या जलस्रोताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नगरकरांनी पुढाकार घेतला पाहिजे.’’
- चंद्रशेखर करवंदे,सावेडी,
आंघोळ
बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लीटर
शॉवरखाली : १०० लीटर
दाढी
नळ सोडून दाढी
केल्यास : १० लीटर
मग घेऊन : १ लीटर
ब्रश
नळ सोडून केल्यास :१० लीटर
मग घेऊन : १ लीटर
कपडे
नळाखाली :११६ लि.
बादलीचा वापर केल्यास : ३६ लीटर
मोटार
पाईप वापरल्यास : १०० लि.
बादलीचा वापर
केल्यास : १८ लीटर
हात धुण्यासाठी
नळाखाली : १० लीटर
मग घेऊन : अर्धा लीटर
शौचविधी
फ्लश केल्यास : २० लीटर
बादलीचा वापर केल्यास : ६ लीटर