अत्याचारानंतर जातपंचायतीने लावले जबरदस्तीने लग्न : तरुणीचा छळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 02:35 PM2018-12-19T14:35:16+5:302018-12-19T14:35:34+5:30

ज्याने अत्याचार केला त्याच तरूणाशी तरूणीचे जबरदस्तीने जातपंचायतीने लग्न लावून दिल्याची घटना राहुरी येथे घडल्याचे समोर आले आहे.

After the atrocities, the Jatpanch enforced the marriage: The harassment of the girl | अत्याचारानंतर जातपंचायतीने लावले जबरदस्तीने लग्न : तरुणीचा छळ सुरूच

अत्याचारानंतर जातपंचायतीने लावले जबरदस्तीने लग्न : तरुणीचा छळ सुरूच

googlenewsNext

राहुरी : ज्याने अत्याचार केला त्याच तरूणाशी तरूणीचे जबरदस्तीने जातपंचायतीने लग्न लावून दिल्याची घटना राहुरी येथे घडल्याचे समोर आले आहे. लग्नानंतरही सासरी छळ होत असल्याने अखेर तरूणी व तिच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली आहे.
राहुरी तालुक्यातील भटक्या समाजातील एका कुटुंबाच्या घरी काही दिवसांपूर्वी लग्न जमविण्यासाठी एक तरूण आला होता़ लग्न जमण्याआधीच त्या तरूणाने सदर तरूणीस शनिशिंगणापूर येथे लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला़ तसेच तरूणीचा आक्षेपार्ह स्थितीत व्हिडिओ चित्रित केला़ ही व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या तरूणाने तरूणीशी लग्न करण्याची मागणी केली़ अखेर तालुक्यातील तांदूळवाडी येथे भटक्या जमातीची जातपंचायत भरवून तेथे सदर मुलीला त्याच तरूणाशी विवाह करण्यास भाग पाडले़ सदर मुलगी सासरी गेल्यानंतरही तिथे तिचा सासरच्या नातेवाईकांनी छळ सुरू केला़ या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित मुलीने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. मुलीने दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या दरम्यान कशीबशी त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत आपल्या आई वडिलांचे घर गाठले आणि सदर सर्व हकीकत आपल्या आई वडिलांना सांगितली. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी सदर तरूणी व तिचे नातेवाईक मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात हजर होते़

Web Title: After the atrocities, the Jatpanch enforced the marriage: The harassment of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.