बदल्यांच्या कोट्यासाठी ‘झेडपी’ अध्यक्षांची लॉबिंग
By Admin | Updated: May 24, 2014 23:56 IST2014-05-24T23:56:15+5:302014-05-24T23:56:15+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षांकडील २0 बदल्यांचा कोटा कायम ठेवावा यासाठी यवतमाळातून लॉबिंग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा परिषद अध्यक्षांनी मुंबईवारी केली आहे.

बदल्यांच्या कोट्यासाठी ‘झेडपी’ अध्यक्षांची लॉबिंग
यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्षांकडील २0 बदल्यांचा कोटा कायम ठेवावा यासाठी यवतमाळातून लॉबिंग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा परिषद अध्यक्षांनी मुंबईवारी केली आहे. गेल्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्षांना २0 बदल्यांचा कोटा दिला गेला होता. या बदल्या त्यांनी एकत्र किंवा वर्षभरात टप्प्याटप्प्याने करायच्या होत्या. या कोट्याआड जणू आर्थिक उलाढालीची मूभा दिली गेली होती. परंतु यावर्षी धडकलेल्या बदल्यांच्या नव्या आदेशात हा कोटा गोठविण्यात आला आहे. त्यामुळे यवतमाळसह राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्ष अस्वस्थ झाले आहे. हा कोटा परत मिळावा म्हणून येथील जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी लॉबिंग केले. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदांसह काँग्रेसमधील आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील ५00 ते ७00 बदल्यांना स्थगनादेश मिळाला आहे. शिक्षकांच्या बदल्या मात्र चांगल्याच लांबणीवर पडण्याची चिन्हे आहे. कारण आधी आरटीईनुसार पदनिर्धारण व त्यानंतर समायोजन करण्याचे निेर्देश आहे. त्यानंतर कुठे शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. पदनिर्धारणाबाबत शासन सूचना तथा आकृतीबंध देणार आहे. त्याची प्रतीक्षा आहे. आता आचारसंहिता लागल्याने या बदल्या ऑगस्टपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)