शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

जिल्हा परिषदेचे शिक्षक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

शैक्षणिक सत्र सुरू होताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्र प्रमुखांसाठी आदेश काढला. त्यात २0२0-२१ पासून १९ सप्टेंबर २0१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शासन निर्णयातील निकष जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा पूर्ण करीत नाही, त्या शाळांचे पाचवी व आठवीचे वर्ग नियमानुसार बंद करून विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करण्याचे सूचित केले.

ठळक मुद्देवर्ग जोडणी आदेशाबाबत संभ्रम : सीईओंच्या स्पष्ट भूमिकेची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षण मंत्रालयाने १९ सप्टेंबर २0१९ रोजी एक निर्णय निर्गमित केला. त्याचा वेगवेगळे अर्थ काढून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेचा पाचवा व आठव्या वर्गाबाबत काढलेल्या आदेशामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली.शैक्षणिक सत्र सुरू होताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्र प्रमुखांसाठी आदेश काढला. त्यात २0२0-२१ पासून १९ सप्टेंबर २0१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शासन निर्णयातील निकष जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा पूर्ण करीत नाही, त्या शाळांचे पाचवी व आठवीचे वर्ग नियमानुसार बंद करून विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करण्याचे सूचित केले. या आदेशाच्या प्रती घेऊन अनेक खासगी शाळांचे शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत धडकत आहे. त्यांनी मुख्याध्यापकांना शाळेचे पाचवी व आठवीचे वर्ग आता बंद झाले असून चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची ‘टीसी’ मागणे सुरू केले. पालकांमध्येही चुकीचा प्रचार सुरू केला आहे.१९ सप्टेंबर २0१९ रोजीच्या शासन निर्णयात यापुढे जिल्हा परिषद किंवा खासगी शाळांना पाचवा व आठवा वर्ग जोडायचे असल्यास, पाचवीसाठी ३0 व आठवीसाठी किमान ३५ विद्यार्थ्यांची आणि अनुक्रमे एक व तीन किलोमीटर अंतराची अट देऊन अशा शाळांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षण संचालकांमार्फत शासनाला सादर करावे, असे स्पष्ट नमूद केले आहे. या शासन निर्णयात सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळांनी वरील निकष पूर्ण करावे व पूर्ण करीत नसल्यास, असे वर्ग बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, असा कुठलाही उल्लेख नाही.शिक्षण आयुक्तांनी १४ मे २0१४ रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पाचवीच्या ९३७ आणि आठवीच्या ३७५ शाळांना नैसर्गिक वाढीने पाचवा व आठवा वर्ग जोडण्यास मान्यता दिली आहे. २८ ऑगस्ट २0१५ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व ग्रामीण व शहरी विभागातील चौथी व सातवीच्या शाळांना नैसर्गिक वाढीनुसार पाचवा व आठवा वर्ग जोडण्याचे निर्देश दिले. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या पाचवा व आठवा वर्ग सुरू असलेल्या सर्व शाळा शासनाने मंजूर करून त्यानुसार शिक्षक संचमान्यता दिली.शिक्षण समितीच्या सभेत झाली चर्चाशिक्षण समितीची बुधवारी सभा झाली. त्यात सभापती श्रीधर मोहोड यांनी पाचवा आणि आठवा वर्ग व आरटीई कायद्याबाबत नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. सभेत सदस्यांनी शालेय पोषण आहार, शालेय साहित्य आदींबाबत प्रश्न उपस्थित केले. मागील वर्षी प्राप्त झालेले साहित्य कुठे गेले, त्याचे काय झाले याबाबत काहीच माहिती नाही. हे साहित्य परस्पर वाटप झाल्याचे सभेत निदर्शनास आणून देण्यात आले. सभापतींनी धानोरा येथील शिक्षण विभागाची जमीन ताब्यात घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. सभेत मोफत गणवेश वाटपाचा आढावा घेण्यात आला. या सभेत आरोग्य विभागाच्या विविध समस्यांवरही चर्चा झाली.विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश वाटपजिल परिषद शाळेच्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके मंजूर करून वाटपसुद्धा केले आहे. त्यामुळे पाचवा व आठवा वर्गाबाबत शिक्षकांमध्ये सुरू असलेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, सरचिटणीस गजानन देऊळकर, विलास गुल्हाने, मिलिंद देशपांडे, पुंडलिक चंदनखेडे, हरिदास कैकाडे, राधेश्याम चेले, आशन्ना गुंडावार, विजय लांडे, देवा वैद्य, संजय राऊत, हरिहर बोके, भुमन्ना कचरेवार, अजय महाजन आदींनी मुख्य कार्यकारी अदिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक