शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अपंगत्वावर मात करत 'आनंद'ने खेचून आणले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 12:10 IST

शिकवणीला जाताना झालेल्या गंभीर अपघातात आनंदच्या पाठीचे मणके तुटले. तो २२ दिवस कोमात राहिला आणि त्यानंतर वर्षभर बेडवर होता. अशा परिस्थितीतही त्याने निर्धार ढळू न देता जिद्दीच्या जोरावर एमटेकमध्ये ७० टक्के गुण मिळविले.

ठळक मुद्दे२२ दिवस कोमात : अपंगत्वावर मात करीत अभियांत्रिकीची पदव्युत्तर परीक्षा पास

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल, तर जीवनात अशक्य असे काहीच नाही. त्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागते. यानंतर यश खेचून आणता येते. यवतमाळच्या आनंद करंदीकर या विद्यार्थ्याने असेच अशक्य काम शक्य करून दाखविले.

आनंदचा शिकवणीला जाताना गंभीर अपघात झाला. त्यात त्याच्या पाठीचे मणके तुटले. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातानंतर तो २२ दिवस कोमात राहिला आणि वर्षभर बेडवर होता. आजही त्याला चालता येत नाही. अशा परिस्थितीत उच्चशिक्षणाचा ध्यास घेतलेल्या आनंदने एमटेकमध्ये ७० टक्के गुण मिळवीत नवा रेकॉर्ड केला. अपघातामुळे त्याला दीक्षांत समारंभाला जाता आले नाही. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हा पुरस्कार सर्वांसमक्ष त्याच्या यवतमाळच्या घरी प्रदान केला. यावेळी विद्यार्थ्यांसह कुटुंबाच्या आनंंदाला पारावार राहिला नाही.

यवतमाळच्या सत्यनारायण लेआउटमध्ये वास्तव्याला असलेला आनंद पूर्वीपासूनच हुशार आहे. त्याचा पॉलीमध्ये नंबर लागला. कॉलेजला जाताना १९९९ मध्ये एका वाहनचालकाने आनंदच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या शरीरातील हाडांचा चुराडा झाला. आनंद कसाबसा वाचला; परंतु तो कोमात गेला होता. २२ दिवस कोमात असल्याने घरच्यांना प्रचंड चिंता होती. काेमातून बाहेर आल्यानंतर त्याला उठूनही बसता आले नाही. त्याचे अनेक ऑपरेशन झाले. वर्षभर तो बेडवरच खेळून होता. घरच्याने त्याची अपेक्षा सोडली होती.

मात्र, आनंद जिद्दी होता. त्याला पॉलीसह अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते. या गंभीर स्थितीत आनंदने पॉलीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी मिळवली. त्याला बीईमध्ये ६७ टक्के मिळाले. या शिक्षणावरच आनंद थांबला नाही. त्याला एमटेकची पदवी घ्यायची होती. या स्थितीत त्याने वर्धा येथील अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्याला ७० टक्के गुण मिळाले.

त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्धा येथे पदवीप्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या पदवीदान कार्यक्रमापूर्वी आनंदचा दुसरा अपघात झाला. यामुळे पदवी स्वीकारण्यासाठी त्याला जाता आले नाही. यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य राजकिशोर तुगनायक यांनी आनंदच्या घरी आई-वडिलांसमक्ष पदवी प्रदान केली. आनंदला पाण्यावर वीजनिर्मितीच्या प्रयोगात पुढील काळात काम करायचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSocialसामाजिक